शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपक्रमांसाठी ‘डीपी’चे द्वार खुले

By admin | Updated: April 29, 2016 03:05 IST

ना विकास क्षेत्राचे द्वार परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठी उघडल्यानंतर या जागांवर सामाजिक उपक्रमांकरिता पहिल्यांदाच विकास नियोजन आराखड्यातून आरक्षण करण्याचे प्रस्तावित आहे़

मुंबई : ना विकास क्षेत्राचे द्वार परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठी उघडल्यानंतर या जागांवर सामाजिक उपक्रमांकरिता पहिल्यांदाच विकास नियोजन आराखड्यातून आरक्षण करण्याचे प्रस्तावित आहे़ यामध्ये वृद्धाश्रम, महिला व बाल कल्याण केंद्र, आधार केंद्र, बेघरांसाठी निवारा अशा सेवांकरिता आरक्षणाची शिफारस आहे़ २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी शहराच्या विकासाचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला़ मात्र त्यामध्ये अनेक शिफारशींवरून वाद उभा राहिला़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले़ हा सुधारित आराखडा विशेष अधिकारी रामनाथ झा यांनी बुधवारी पत्रकारांसमोर जाहीर केला़ यामध्ये मुंबईतील चटईक्षेत्र निर्देशांक २ ते ५ पर्यंत वाढविण्यात आला आहे़ना विकास क्षेत्र विकासासाठी खुले करण्याचा मुद्दा प्रामुख्याने वादात सापडला होता़ सुधारित आराखड्यात ना विकास क्षेत्र गृहनिर्माण आणि सामाजिक उपक्रमांसाठी खुले करण्यात आले आहे़ येथील तिवर व नैसर्गिक वनजीव, सागरी नियंत्रण क्षेत्र या परिसरात कोणत्याही प्रकारच्या विकासाला परवानगी नसेल, अशी हमी आयुक्त अजय मेहता यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)सामाजिक उपक्रमांसाठी आरक्षणना विकास क्षेत्रावरील पूर्वीचा ०़२० एफएसआय ०़४० करण्यात आला आहे़ म्हणजेच ५० टक्के एफएसआय जमीन मालकाला मिळणार आहे. उर्वरित ५० टक्के राखीव जागेवर परवडणारी घरे व सामाजिक उपक्रमांसाठी बांधकाम करण्यात येईल़ म्हणजेच ३० हजार चौ़मी़च्या ना विकास क्षेत्रावर दोन एफएसआय मिळाल्यास एकूण ६० हजार चौ़मी़ बांधकाम शक्य होईल़ हे ३० हजार चौ़मी़ पालिकेला सामाजिक उपक्रमांसाठी वापरता येणार आहे़ जमीन मालकाला घरे बांधून पालिकेच्या ताब्यात द्यावी लागतील आणि पालिका लॉटरीच्या माध्यमातून वितरण करेल.>या त्रुटी दूर करणार खासगी जमिनीतूनही आरक्षित करण्यात आलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या प्रस्तावांना वगळण्यात आले आहे़ फेरीवाल्यांची समस्या व त्यासाठी तरतुदींना आराखड्यात प्राधान्य देण्यात आले आहे़झोपडपट्ट्यांची नोंद झाली नव्हती, याबाबत आरोप होत होते़ हे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले आहे़>मिठागरांवर गृहनिर्माणमुंबईतील मिठागरांवर कोणत्याही प्रकारच्या विकासाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही़ यासाठी केंद्राकडून परवानगी आवश्यक असताना पालिकेने विकास आराखड्यात अशी तरतूद केल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ परवडणाऱ्या घरांसाठी मिठागरांची जागा खुली करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार करून केंद्राकडे पाठविला आहे़ यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली होती़ मात्र अद्याप याबाबत केंद्राने धोरण निश्चित केलेले नाही़