शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दुष्काळात डाळींच्या दरवाढीचा दणका; व्यापारीच मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:51 IST

दीड महिन्यात क्विंटलमागे दोन हजारांची वाढ

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मागणीत सातत्याने होत असलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीत घटलेले उत्पादन यामुळे डाळींच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे. दीड महिन्यांतच क्विंटलमागे सरासरी दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली असून, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे. तूर, मूग आणि हरभरा डाळ यांच्या दराचा आलेख ऐन दुष्काळातच वाढत चालला आहे.

महागाई दिवसेंदिवस वाढत असताना, आता पुन्हा डाळींच्या दराने त्यात मोठी भर टाकली आहे. तुरीचे पीक फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात आले. तूरडाळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मुबलक प्रमाणात विक्रीस आली, तेव्हा ठोक बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भावाने विक्री झाली. दीड महिन्यातच प्रतिकिलोचे भाव ८० ते ९० रुपयांवर पोहोचले आहेत. कमी पावसामुळे यावर्षी तुरीसह सर्वच कडधान्यांचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज होता. सर्व बाबी हेरून व्यापाºयांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूरडाळ पुन्हा शंभर रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.सांगलीसह लातूर, बीड परिसरातून येथील मार्केटमध्ये डाळींची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते.

तीन वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव प्रतिकिलो १७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे दोन वर्षापूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे डाळींचे दर उतरले होते. यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. सध्या मूगडाळीचा दर ७५०० ते ८००० रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. किरकोळ मूगडाळीची विक्री ८० ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. हरभºयाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचेही भाव वाढत आहेत. हरभरा भाव ३८०० ते ४००० रुपये क्विंटल असा आहे. हरभरा डाळीचा दर ५७०० ते ६५०० रुपये क्विंटल असून, त्यामध्ये तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली. हरभरा डाळीची किरकोळ विक्री ५५ ते ७० रुपये किलोने होत आहे. तूरडाळ ८००० ते ९००० रुपये क्विंटल झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. 

मान्सून आणि परतीचा पाऊस कमी झाल्यामुळे कडधान्याची पेरणी कमी झाली आहे. म्हणूनच सध्या डाळींच्या किमती वाढत आहेत. यावर्षी पाऊस झाला नाही, तर पुन्हा डाळींच्या किमतीमध्ये वाढच होण्याची शक्यता आहे. मागील दीड महिन्यांपेक्षा सध्या प्रति क्विंटलला सरासरी दीड ते दोन हजाराने डाळींचे दर वाढले आहेत. - वसंत माळी, व्यापारी,वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली.