शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दुष्काळात डाळींच्या दरवाढीचा दणका; व्यापारीच मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:51 IST

दीड महिन्यात क्विंटलमागे दोन हजारांची वाढ

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मागणीत सातत्याने होत असलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीत घटलेले उत्पादन यामुळे डाळींच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे. दीड महिन्यांतच क्विंटलमागे सरासरी दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली असून, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे. तूर, मूग आणि हरभरा डाळ यांच्या दराचा आलेख ऐन दुष्काळातच वाढत चालला आहे.

महागाई दिवसेंदिवस वाढत असताना, आता पुन्हा डाळींच्या दराने त्यात मोठी भर टाकली आहे. तुरीचे पीक फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात आले. तूरडाळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मुबलक प्रमाणात विक्रीस आली, तेव्हा ठोक बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भावाने विक्री झाली. दीड महिन्यातच प्रतिकिलोचे भाव ८० ते ९० रुपयांवर पोहोचले आहेत. कमी पावसामुळे यावर्षी तुरीसह सर्वच कडधान्यांचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज होता. सर्व बाबी हेरून व्यापाºयांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूरडाळ पुन्हा शंभर रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.सांगलीसह लातूर, बीड परिसरातून येथील मार्केटमध्ये डाळींची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते.

तीन वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव प्रतिकिलो १७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे दोन वर्षापूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे डाळींचे दर उतरले होते. यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. सध्या मूगडाळीचा दर ७५०० ते ८००० रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. किरकोळ मूगडाळीची विक्री ८० ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. हरभºयाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचेही भाव वाढत आहेत. हरभरा भाव ३८०० ते ४००० रुपये क्विंटल असा आहे. हरभरा डाळीचा दर ५७०० ते ६५०० रुपये क्विंटल असून, त्यामध्ये तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली. हरभरा डाळीची किरकोळ विक्री ५५ ते ७० रुपये किलोने होत आहे. तूरडाळ ८००० ते ९००० रुपये क्विंटल झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. 

मान्सून आणि परतीचा पाऊस कमी झाल्यामुळे कडधान्याची पेरणी कमी झाली आहे. म्हणूनच सध्या डाळींच्या किमती वाढत आहेत. यावर्षी पाऊस झाला नाही, तर पुन्हा डाळींच्या किमतीमध्ये वाढच होण्याची शक्यता आहे. मागील दीड महिन्यांपेक्षा सध्या प्रति क्विंटलला सरासरी दीड ते दोन हजाराने डाळींचे दर वाढले आहेत. - वसंत माळी, व्यापारी,वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली.