शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

लॉकडाऊन दरम्यान शुल्क आकारणीचा तगादा नको; शिक्षण विभागाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:21 IST

मुंबई : सध्या सर्वत्र १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे अनेकांना घरी बसावे लागले आहे. अशातच एप्रिल महिना ...

मुंबई : सध्या सर्वत्र १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे अनेकांना घरी बसावे लागले आहे. अशातच एप्रिल महिना सुरू होत असल्याने अनेक शाळांची शैक्षणिक वर्षही संपली आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांकडून  विशेषतः बड्या ,, आणि केंद्रीय  मंडळाच्या शाळांकडून पालकांकडे मुलांची फी भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. लॉकडाऊन आधीच अनेकांचे आर्थिक गणित बिघडले असल्याने शुल्क भरण्यासाठी मुदत मिळावी, अशी अपेक्षा अनेक पालकांकडून व्यक्त केली जात होती . या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये पालकांना सक्ती करण्यात येऊ नये असे परिपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे. 

 

संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असल्याने अनेक पालकांचे रोजगाराचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशा परिस्थितीत शाळांनी पालकांकडे शाळेची फी भरण्यासाठी तगादा लावणे योग्य नाही, अशी सूचना शिक्षण विभागाने आहे. केंद्रीय मंडळाच्या  शाळांचे शैक्षणिक वर्ष  सुरु होण्याची वेळ झाली  असल्याने शहरातील  शाळांतून  पालकांना ईमेल व मेसेजेसच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठी  संदेश धाडण्यात आले आहेत. मात्र यामुळे पालकांपुढे अडचण निर्माण झाली असल्याच्या तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयांना प्राप्त होत आहेत. 

 

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंडळाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना चालू वर्षाची व आगामी शैक्षणिक वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक असल्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार लॉकडाऊन संपल्यानंतर फी गोळा करण्याची कार्यवाही शाळांनी करावी , आत्ता पालकांना सक्ती करण्यात येऊ नये अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. 

 

अत्यंत चांगला निर्णय आहे सरकारने. आज देशातच नव्हे तर सार्या जगात कोरोना वायरसच्या दहशतीतून मानवतावादी निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक परिस्थिती ढेपाळली असतानाच मुलांच्या पालकांना आपल्या मुलांच्याही शिक्षणाची काळजी लागली असताना सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे. 

उदय नरे, शिक्षक,  हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल