शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

रक्तदात्यांनाही मोजावी लागते किंमत

By admin | Updated: April 29, 2016 01:53 IST

रक्तदात्यांना स्वत:ला अथवा त्यांच्या नातेवाइकांना रक्ताची गरज भासल्यास रक्त उपलब्ध होत नाही.

पिंपरी : एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करण्यास धावून जाणाऱ्या रक्तदात्यांना स्वत:ला अथवा त्यांच्या नातेवाइकांना रक्ताची गरज भासल्यास रक्त उपलब्ध होत नाही. वेळोवेळी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. रक्तदान शिबिरे होतात. मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित होते, तरीही रक्ताचा तुटवडा का भासतो, असा प्रश्न रक्तदात्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे. कोणताही मोबदला मिळण्याची अपेक्षा न बाळगता अनेक जण रक्तदान करतात. अपघातातील जखमी अथवा आजारी रुग्ण यांच्यावर शस्त्रक्रिया करतेवेळी रक्ताची तातडीने गरज भासते. अशा वेळी रक्तदात्यांकडे संपर्क साधताच, ते रक्तदान करण्यास तयार होतात. आपली कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढून ते रक्तदान करतात. रक्तदानाची आवड आणि सामाजिक भान असल्याने वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तपेढ्यांना रक्त उपलब्ध करून दिले जाते. राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी, नेत्यांचे वाढदिवस, सण-समारंभ या निमित्ताने ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जातात. या शिबिरात संकलित झालेले रक्त रक्तपेढ्यांना दिले जाते. रक्तदात्यांनी मोफत दिलेले रक्त रक्तपेढ्या अव्वाच्या सव्वा दराने रुग्णांना देतात. रक्तपेढ्यांमधून उपलब्ध होणाऱ्या रक्तासाठी विविध ठिकाणी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यामुळे रक्तदात्यांमध्ये आता रक्तदानाबद्दल अनास्था दिसून येत आहे. रक्तातील पर्यायी घटक कृत्रिमरीत्या तयार करता येतात. परंतु, रक्त तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तदानाला पर्याय नाही. रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा रक्तदात्यांवर अवलंबून असतो. शहरातील विविध रक्तपेढ्यांतून रक्तदात्यांच्या संख्येत वाढ होत असली, तरी रक्ताची आवश्यकताही अधिक भासते आहे. त्यामुळे त्या प्रमाणात रक्त उपलब्ध होणे अपेक्षित आहे, असे विविध रुग्णालयांतील डॉक्टरांचे मत आहे. रोगाचे निदान करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या, तरी आजार बळावणे थांबत नाही. आॅपरेशनसाठी रक्ताची जास्त गरज असते. अलीकडच्या काळात अवयव प्रत्यारोपणाला महत्त्व आले आहे. मूत्रपिंड किंवा यकृताच्या प्रत्यारोपणासाठी एकाच गटाच्या पाच ते दहा पिशव्यांची गरज असते. त्याशिवाय डेंगीसारख्या आजारात प्लेटलेट्सची संख्या घटते. अशा वेळी रक्ताची गरज भासते. रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागते.(प्रतिनिधी)