शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदात्यांनाही मोजावी लागते किंमत

By admin | Updated: April 29, 2016 01:53 IST

रक्तदात्यांना स्वत:ला अथवा त्यांच्या नातेवाइकांना रक्ताची गरज भासल्यास रक्त उपलब्ध होत नाही.

पिंपरी : एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करण्यास धावून जाणाऱ्या रक्तदात्यांना स्वत:ला अथवा त्यांच्या नातेवाइकांना रक्ताची गरज भासल्यास रक्त उपलब्ध होत नाही. वेळोवेळी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. रक्तदान शिबिरे होतात. मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित होते, तरीही रक्ताचा तुटवडा का भासतो, असा प्रश्न रक्तदात्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे. कोणताही मोबदला मिळण्याची अपेक्षा न बाळगता अनेक जण रक्तदान करतात. अपघातातील जखमी अथवा आजारी रुग्ण यांच्यावर शस्त्रक्रिया करतेवेळी रक्ताची तातडीने गरज भासते. अशा वेळी रक्तदात्यांकडे संपर्क साधताच, ते रक्तदान करण्यास तयार होतात. आपली कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढून ते रक्तदान करतात. रक्तदानाची आवड आणि सामाजिक भान असल्याने वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तपेढ्यांना रक्त उपलब्ध करून दिले जाते. राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी, नेत्यांचे वाढदिवस, सण-समारंभ या निमित्ताने ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जातात. या शिबिरात संकलित झालेले रक्त रक्तपेढ्यांना दिले जाते. रक्तदात्यांनी मोफत दिलेले रक्त रक्तपेढ्या अव्वाच्या सव्वा दराने रुग्णांना देतात. रक्तपेढ्यांमधून उपलब्ध होणाऱ्या रक्तासाठी विविध ठिकाणी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यामुळे रक्तदात्यांमध्ये आता रक्तदानाबद्दल अनास्था दिसून येत आहे. रक्तातील पर्यायी घटक कृत्रिमरीत्या तयार करता येतात. परंतु, रक्त तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तदानाला पर्याय नाही. रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा रक्तदात्यांवर अवलंबून असतो. शहरातील विविध रक्तपेढ्यांतून रक्तदात्यांच्या संख्येत वाढ होत असली, तरी रक्ताची आवश्यकताही अधिक भासते आहे. त्यामुळे त्या प्रमाणात रक्त उपलब्ध होणे अपेक्षित आहे, असे विविध रुग्णालयांतील डॉक्टरांचे मत आहे. रोगाचे निदान करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या, तरी आजार बळावणे थांबत नाही. आॅपरेशनसाठी रक्ताची जास्त गरज असते. अलीकडच्या काळात अवयव प्रत्यारोपणाला महत्त्व आले आहे. मूत्रपिंड किंवा यकृताच्या प्रत्यारोपणासाठी एकाच गटाच्या पाच ते दहा पिशव्यांची गरज असते. त्याशिवाय डेंगीसारख्या आजारात प्लेटलेट्सची संख्या घटते. अशा वेळी रक्ताची गरज भासते. रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागते.(प्रतिनिधी)