शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

डोंबिवलीत व्यावसायिकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 04:54 IST

जेसीबी-पोकलेन व्यावसायिक सतीश रसाळ (४२)यांची त्यांच्या झायलो गाडीतच गळा चिरून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

डोंबिवली : जिमखाना रोड येथे राहणारे जेसीबी-पोकलेन व्यावसायिक सतीश रसाळ (४२)यांची त्यांच्या झायलो गाडीतच गळा चिरून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. रसाळ यांच्या हत्येमागील कारणाचा लागलीच उलगडा झाला नसला तरी तपासाकरिता पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत.मानपाडा रोडवरील ‘क्लासिक हॉटेल’ समोर उभ्या असलेल्या एमएच ०५ एएस ४५५५ नंबरच्या सफेद रंगाच्या झायलो गाडीत रक्ताच्या थारोळ््यात पडलेला एक मृतदेह शुक्र वारी सकाळी ९ च्या सुमारास रिक्षा चालक राजेश पाटील यांना दिसला. त्यांनी त्याची खबर मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख शांताराम अवसरे यांना कळविली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ती व्यक्ती पोकलेन व्यावसायिक रसाळ हे असल्याचा उलगडा झाला.मूळचे निळजे गावातील रहिवासी असलेले सतीश रसाळ यांचा काटई टोलनाका येथे हनुमान जेसीबी-पोकलन सप्लायर हे कार्यालय आहे. काल रात्री १० वाजता ते कार्यालय बंद करून घरी येण्याकरिता निघाले. मात्र रात्रभर ते घरी न आल्याने त्यांची पत्नी व अन्य नातेवाईक त्यांना सतत फोन करत होते. रसाळ हे जिमखाना रोड येथे पत्नी व तीन मुलींसह राहत होते. कार्यालयातून घरी परतत असताना बहुदा रात्रीच त्यांची हत्या झाली असावी, असा अंदाज आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व कोणाशी कोणत्या प्रकारचा वाद नसलेल्या रसाळ यांची अशी हत्या झाल्याने त्यांचा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान ही हत्या पूर्ववैमनस्यातून, व्यावासिक वादातून की अन्य कोणत्या कारणातून झाली याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपींना लवकरच अटक करू, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवसरे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)मृतदेह चालकाच्या सीटवर आढळला.कल्याण परिमंडळ - ३ चे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, कल्याण गुन्हे अन्वेष विभागाचे शैलेंद्र नगरकर, श्वान पथक आदींनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. रसाळ यांच्या गळ््यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. ही हत्या एकाने केली नसून ३ ते ४ जणांनी मिळून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या कोणी व का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.पोलिसांनी रसाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुग्णालयात पाठवला असून झायलो गाडी मानपाडा पोलीसांनी जप्त केली असून ती स्थानकातच आहे. मानपाडा पोलिसांसह ठाणे जिल्ह्यातील पाचही गुन्हे अन्वेषण पथके या हत्याकांडाचा तपास करीत आहेत.