शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

निवाऱ्याअभावी कुत्री भटकीच

By admin | Updated: August 3, 2016 00:47 IST

श्वानदंश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पुणे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले

पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, श्वानदंश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पुणे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यावर नियंत्रण येण्यासाठी २ वर्षांपूर्वी पालिकेतर्फे शहराच्या ४ भागांत भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्यात येणार होती. मात्र अद्याप केवळ दोनच शेल्टर कार्यरत असल्याने श्वानदंशांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पालिकेच्या रुग्णालयांत दर महिन्याला दीड हजारहून अधिक रुग्ण हे केवळ कुत्र्याच्या चाव्यामुळे आले असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जानेवारी २०१६ पासून मे २०१६ पर्यंत ८४९० जणांना शहरातील विविध भागांत श्वानदंश झाला असल्याचे यामधून स्पष्ट होते. दोन वर्षांपूर्वी पालिकेत झालेल्या ठरावानुसार ४ ठिकाणी कुत्र्यांचे शेल्टर करण्यात येणार होते. मात्र, दोन वर्षे होऊनही अद्याप केवळ दोनच ठिकाणी हे शेल्टर सुरू झाले आहेत. यामध्ये केशवनगर येथील मुंढवा येथे व नायडू रुग्णालयाच्या आवारातील शेल्टर कार्यरत झाले आहेत. यामध्ये अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल रुल २००१ या कायद्यानुसार कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. तसेच त्यांचे लसीकरणही करण्यात येते, अशी माहिती महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अमित शहा यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘या दोन्ही ठिकाणी मिळून सध्या दिवसाला ५० ते ६० कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी केली जात आहे. सध्या या कामासाठी पालिकेकडे दोन्ही मिळून ८ एकर जागा उपलब्ध असून, वर्षाला ६० लाख इतका निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेतर्फे वेळोवेळी विविध कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. बालेवाडी येथे तिसरा प्रकल्पाचे काम चालू असून, येत्या वर्षभरात तो पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहायक प्रभारी उपआरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.डॉ. साबणे म्हणाल्या, की सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याचे काम पालिका प्रशासनाबरोबरच ४ स्वयंसेवी संस्थांना देण्यात आले आहे. शेल्टरच्या प्रकल्पासाठी आणखी मोकळ्या जागेचा शोध चालू असून, ती मिळाल्यास हे काम आणखी वेगाने चालू होईल. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये रेबिजविरोधी लस उपलब्ध करण्यात आली असून, या लसीचा अतिरिक्त साठाही पालिकेने उपलब्ध केला आहे. कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबिज आणि त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची या वर्षातील संख्या १५ आहे. रेबिजच्या रुग्णांचे उपचार पुण्यातील नायडू रुग्णालयात होतात.