शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

कुत्रे पाळताय, मग नियमही पाळा !

By admin | Updated: July 4, 2016 02:27 IST

रात्री प्रवासात चोराची भीती कमी, पण भटक्या कुत्र्यांची भीती जास्त अशी परिस्थिती आहे.

मुंबई : रात्री प्रवासात चोराची भीती कमी, पण भटक्या कुत्र्यांची भीती जास्त अशी परिस्थिती आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील गल्ल्यांमध्ये हजारो भटके कुत्रे आहेत. त्यांना घाबरूनच मुंबईकर प्रवास करतात. पण या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या श्वानप्रेमींना आता त्यांच्या संगोपनाचे नियम पाळावे लागणार आहेत. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाने भटक्या कुत्र्यांच्या पालनाची नियमावली तयार केली असून, श्वानप्रेमींना ती पाळणे बंधनकारक असणार आहे.भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईतील प्रत्येक नागरिकांना आहे. रात्री-अपरात्री घरी परतताना कुत्र्यांना घाबरून सारे प्रवास करतात. आतापर्यंत अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी नागरिकांनी हल्ले केले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर उपाय म्हणून भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या श्वानप्रेमींवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला असून आता भटक्या कुत्र्यांना सांभाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील, असे म्हटले आहे. यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याची काळजी श्वानप्रेमींना घ्यावी लागणार आहे. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करणे, आरोग्य तपासणी करणेही श्वानप्रेमींना बंधनकारक राहणार आहे. हे नियम मोडल्यास दंडात्मक रकमेची तरतूदही वेल्फेअरने केली आहे. (प्रतिनिधी)भटके कुत्रे असोत वा पाळीव, नियमांचे पालन केलेचे पाहिजे. श्वानप्रेमींनी तर या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कुत्र्यांना खायला घातले की जबाबदारी संपत नाही, तर त्यांची काळजी आपणच घ्यायला हवी. विशेषत: भटक्या कुत्र्यांबाबत बोलायचे झाल्यास ५० कुत्र्यांवर खाण्याचा खर्च करण्यापेक्षा फक्त १० कुत्र्यांच्या संगोपनाचा सगळा खर्च उचला. त्यामुळे कुत्र्यांपासून होणारे आजारही कमी होतील.- सुनीश कुंजू, सचिव, प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी>हे नियम पाळाचभटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांना त्यांच्या आरोग्य तपासणी आणि नसबंदीची जबाबदारी घ्यावी लागेल.इमारत परिसर, चाळीमध्ये भटक्या कुत्र्यांना आसरा देऊ नका. खेळाची मैदाने आणि लहान मुलांपासून कुत्र्यांना दूरच ठेवा.सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालू नका.कुत्र्यांना ज्या ठिकाणी खायला घालाल, तेथील शिल्लक उष्टे उचलून टाकणे, खाद्यपदार्थ घालणाऱ्याची जबाबदारी असेल.कुत्र्याने विष्ठा केली तर ती साफ करण्याची जबाबदारी श्वानप्रेमींची.