शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘ऐ मेरे वतन की..’ची रॉयल्टी शहिदांच्या विधवांपर्यंत पोहोचते का?

By admin | Updated: August 17, 2014 00:52 IST

‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पानी’ या अजरामर गीताचे रचयिते राष्ट्रकवी प्रदीप यांनी या गाण्यातून मिळणाऱ्या रॉयल्टीची रक्कम सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांच्या विधवांना

मितुल प्रदीप यांची शंका : सारेगामा व संरक्षण मंत्रालयाने खुलासा करण्याची मागणी नागपूर : ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पानी’ या अजरामर गीताचे रचयिते राष्ट्रकवी प्रदीप यांनी या गाण्यातून मिळणाऱ्या रॉयल्टीची रक्कम सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांच्या विधवांना समर्पित केली होती. परंतु या रकमेविषयी कुणालाही कुठल्याही प्रकारची माहिती नाही. सारे गौडबंगाल आहे, अशी शंका उपस्थित करीत ती रक्कम खरेच संरक्षण विभागापर्यंत पोहोचते का? आणि शहीद सैनिकांच्या विधवांसाठीच ती रक्कम खर्च केली जाते किंवा नाही, यासंदर्भात संरक्षण विभागाने आणि या सारेगामा या संगीत कंपनीने खुलासा करावा, अशी मागणी कवी प्रदीप यांच्या कन्या आणि कवी प्रदीप फाऊंडेशनच्या सचिव मितुल प्रदीप यांनी आज येथे केली. शनिवारी शंकरनगर चौकस्थित राष्ट्रभाषा संकुलमधील वनराईच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी आणि कवी प्रदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष खा. अविनाश पांडे उपस्थित होते. मितुल यांनी सांगितले, कवी प्रदीप हे राष्ट्रवादी होते. लोकांना प्रेरणा मिळेल अशा गीतांची रचना त्यांनी केली. चीनसोबत झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर गीताची रचना केली. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना त्यांनी हे गीत अर्पण केले. तसेच या गीताच्या रूपात मिळणारी रॉयल्टी त्यांनी शहीद सैनिकांच्या विधवांना समर्पित केली. ‘एचएमव्ही’ या संगीत कंपनीने हे गीत रेकॉर्ड केले होते. सध्या ही कंपनी सारेगामा म्हणून ओळखली जाते. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे अजरामर गीत आजही प्रसिद्ध आहे. संगीत कंपनी या गीतातून आजही मोठ्या प्रमाणावर पैसा कमविते.परंतु त्याच्या रॉयल्टीची रक्कम ही शहीद सैनिकांच्या विधवांसाठी खर्च केली जाते किंवा नाही याची माहिती नाही. मध्यंतरी यासंदर्भात एक जनहित याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. तेव्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार काही रक्कम मिळाली होती. तसेच त्यासंदर्भात कवी प्रदीप यांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्याचे सांगण्यात आले होते. कंपनीला विचारणा केली तर रॉयल्टीची रक्कम संरक्षण विभागाला दिली जात असल्याचे सांगितले जाते. डिफेन्सला विचारले तर तेही म्हणतात की रक्कम मिळते. प्रदीपजींचे गीत आनंदभवनात अजूनही संरक्षिततत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत २७ फेब्रुवारी १९६३ रोजी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमवर ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत लता मंगेशकर यांनी गायले. गीत ऐकून पं. नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी गीत लिहिणाऱ्या गीतकाराबाबत विचारले. परंतु त्या कार्यक्रमाला कवी प्रदीप यांना आमंत्रितच करण्यात आले नव्हते. याबाबत प्रदीप यांना कुठलीही खंत नव्हती. त्याचे वाईटही त्यांनी वाटून घेतले नाही. त्यानंतर २१ मार्च रोजी पं. नेहरू मुंबईच्या दौऱ्यावर आले. तेव्हा त्यांनी पुन्हा कवी प्रदीप यांच्याबाबत विचारणा केली. तेव्हा तत्कालीन संरक्षणमंत्री शंकरराव चव्हाण हे कवी प्रदीप यांच्या घरी आले. त्यांनी प्रदीप यांना राजभवनावर नेले. तिथे त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. तसेच त्याच ठिकाणी त्यांनी गीत लिहून दिले. ते गीत आजही ‘आनंदभवन’ या पं. नेहरू यांच्या निवासस्थानातील संग्रहालयात सुरक्षित आहे. तसेच रॉबर्ट मनी हायस्कूल मुंबई येथे एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पं. नेहरू यांनी कवी प्रदीप यांना आमंत्रित केले. त्या कार्यक्रमात कवी प्रदीप यांनी नेहरूजींच्या समोर ऐ मेरे वतन के.. हे गीत सादर केले. ही आठवणसुद्धा मितुल यांनी सांगितली. (प्रतिनिधी)