शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

खाण्यावर बंदी घातल्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते का? - हायकोर्ट

By admin | Updated: December 13, 2015 03:04 IST

गोवंश हत्याबंदीला विरोध करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने खाण्यावर बंदी टाकल्याने मूलभूत अधिकारांचे

मुंबई : गोवंश हत्याबंदीला विरोध करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने खाण्यावर बंदी टाकल्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते का? अशी विचारणा या याचिकांमध्ये मध्यस्थी करणाऱ्यांना केली.भविष्यात जर राज्य सरकारने मांसाहार खाण्यावर बंदी घातली, तर नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होणार आहे का? किंवा राज्य सरकारने आणखी काही खाण्याच्या वस्तूंवर बंदी घातली, तर लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होणार आहे का? असे प्रश्न न्या. अभय ओक व न्या. शिरीष गुप्ते यांनी मध्यस्थींच्या वकिलांना विचारले.राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना, राज्य सरकारने जर नागरिकांनी ठरावीकच प्रमाणात पाणी प्यायचे असा कायदा आणला, तर कोणत्या अधिकाराचे उल्लंघन होते? असे खंडपीठाने सहजच मध्यस्थींच्या वकिलांना विचारले. मध्यस्थी याचिका करून, राज्य सरकारच्या बैल मांसबंदीचे समर्थन करणाऱ्या, आत्मकमल लब्दी ट्रस्टच्या वतीने अ‍ॅड. अंतुरकर यांनी, ही बंदी जनहितार्थ असल्याचे म्हटले.राज्य सरकार केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर राज्याच्या बाहेरील गायीही वाचवत आहे. त्या वाचवण्यासाठी सरकारने कायदा तयार केला, तर त्यात गैर काय? असा युक्तिवाद अ‍ॅड. अंतुरकर यांनी केला, तर युनियम मुस्लीम लीगच्या वतीने ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांनी या बंदीमुळे मुस्लीम समाज आणि खाटिकाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, असे खंडपीठाला सांगितले.बैलांचा बळी देणे, ही प्रथा धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, असे आम्हाला दाखवून द्या, असे खंडपीठाने म्हणत, या याचिकांवरील पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य प्राणी संरक्षण (सुधारित) कायद्यांतर्गत बैलांची कत्तल करणे, मांस खाणे, मांस बाळगणे, विक्री करणे, आयात करण्यावर बंदी घातली आहे, तसेच शिक्षेची तरतूदही केली आहे.