शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

कोणी घर देता का घर?

By admin | Updated: August 1, 2016 02:20 IST

शहरातील महत्वाच्या प्रकल्पामधील ‘ईस्टर्न फ्री वे’ सुरु होउन तीन वर्ष उलटली.

मुंबई : शहरातील महत्वाच्या प्रकल्पामधील ‘ईस्टर्न फ्री वे’ सुरु होउन तीन वर्ष उलटली. मात्र यातील २ हजार प्रकल्पग्रस्त कुटुंबियांना एमएमआरडीएने घरे दिलेली नाहीत. त्यामुळे ऐन पावसाळ््यात या कुटुंबियांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. शासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष दयावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ‘रहिवाशांनी दिला आहे.मुंबई शहराच्या बाहेरुन येणाऱ्या वाहनांना शहरातील वाहतूक कोंडीत अडकून न पडता तत्काळ दक्षिण मुंबईत पोहचता यावे, यासाठी एमएमआरडीने ईस्टर्न फ्री वे हा मार्ग बांधला. या प्रकल्पात सात हजार झोपडीधारकांच्या झोपड्या येत होत्या. प्रकल्पग्रस्त सर्व झोपडयांचे एमएमआरडीए पुनर्वसन करेल, असे आश्वासन झोपडीधारकांना देण्यात आले होते. मात्र एमएमआरडीएने या प्रकल्पातील केवळ पाच हजार झोपड्यांचे पाजंरापोळ, मानखुर्द लल्लूभाई कंपाऊन्ड आणि गोवंडी परिसरात पुनर्वसन केले आहे. उर्वरित २ हजार झोपड्या या बोगद्याच्या वरच आहेत. या झोपडीधारकांचे देखील एमएमआरडीएने पुनवर्सन कारावे अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. तरीही या आमच्या समस्येकडे एमएमआरडीए दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी येथील पांजरापोळ एकता समितीचे अध्यक्ष लाजरस ठोंबे यांनी एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार केला. मात्र उर्वरित झोपड्या या प्रकल्पामध्ये बाधित नसल्याने त्यांचे पुनवर्सन होऊ शकत नाही, असे उत्तर त्यांना एमएमआरडीएने दिले आहे. याठिकाणी प्रकल्प सुरु असताना होणाऱ्या सुरुंग स्फोटामुळे अनेक झोपड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बोगद्यामुळे रहिवाशांना घरांचे बांधकाम देखील करता येत नाही. त्यामुळे या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. या रहिवाशांचे पुनवर्सन करण्याची जवाबदारी ही शासनाची आहे. त्यांनी या रहिवाशांचे डोंगराच्या खाली पुनवर्सन करावे त्यानंतर डोंगरावरील रिकाम्या जागेत गार्डन तयार करावे, असा प्रस्ताव या समितीने एमएमआरडीए समोर मांडला आहे. मात्र एमएमआरडीए अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याने येत्या काही दिवसातच याठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील समितीच्या वतीने देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)