शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कोणी घर देता का घर?

By admin | Updated: August 1, 2016 02:20 IST

शहरातील महत्वाच्या प्रकल्पामधील ‘ईस्टर्न फ्री वे’ सुरु होउन तीन वर्ष उलटली.

मुंबई : शहरातील महत्वाच्या प्रकल्पामधील ‘ईस्टर्न फ्री वे’ सुरु होउन तीन वर्ष उलटली. मात्र यातील २ हजार प्रकल्पग्रस्त कुटुंबियांना एमएमआरडीएने घरे दिलेली नाहीत. त्यामुळे ऐन पावसाळ््यात या कुटुंबियांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. शासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष दयावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ‘रहिवाशांनी दिला आहे.मुंबई शहराच्या बाहेरुन येणाऱ्या वाहनांना शहरातील वाहतूक कोंडीत अडकून न पडता तत्काळ दक्षिण मुंबईत पोहचता यावे, यासाठी एमएमआरडीने ईस्टर्न फ्री वे हा मार्ग बांधला. या प्रकल्पात सात हजार झोपडीधारकांच्या झोपड्या येत होत्या. प्रकल्पग्रस्त सर्व झोपडयांचे एमएमआरडीए पुनर्वसन करेल, असे आश्वासन झोपडीधारकांना देण्यात आले होते. मात्र एमएमआरडीएने या प्रकल्पातील केवळ पाच हजार झोपड्यांचे पाजंरापोळ, मानखुर्द लल्लूभाई कंपाऊन्ड आणि गोवंडी परिसरात पुनर्वसन केले आहे. उर्वरित २ हजार झोपड्या या बोगद्याच्या वरच आहेत. या झोपडीधारकांचे देखील एमएमआरडीएने पुनवर्सन कारावे अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. तरीही या आमच्या समस्येकडे एमएमआरडीए दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी येथील पांजरापोळ एकता समितीचे अध्यक्ष लाजरस ठोंबे यांनी एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार केला. मात्र उर्वरित झोपड्या या प्रकल्पामध्ये बाधित नसल्याने त्यांचे पुनवर्सन होऊ शकत नाही, असे उत्तर त्यांना एमएमआरडीएने दिले आहे. याठिकाणी प्रकल्प सुरु असताना होणाऱ्या सुरुंग स्फोटामुळे अनेक झोपड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बोगद्यामुळे रहिवाशांना घरांचे बांधकाम देखील करता येत नाही. त्यामुळे या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. या रहिवाशांचे पुनवर्सन करण्याची जवाबदारी ही शासनाची आहे. त्यांनी या रहिवाशांचे डोंगराच्या खाली पुनवर्सन करावे त्यानंतर डोंगरावरील रिकाम्या जागेत गार्डन तयार करावे, असा प्रस्ताव या समितीने एमएमआरडीए समोर मांडला आहे. मात्र एमएमआरडीए अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याने येत्या काही दिवसातच याठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील समितीच्या वतीने देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)