शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

संतविचारांतून सहिष्णुतेची शिकवण

By admin | Updated: December 26, 2015 00:51 IST

महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा वारसा असून, सर्व जाती, धर्मातील संतांनी समाजप्रबोधनाचे व्यापक कार्य केले़ संतसाहित्य आणि विचाराने समाजाला सहिष्णुतेची शिकवण दिली, असे मत

अहमदनगर : महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा वारसा असून, सर्व जाती, धर्मातील संतांनी समाजप्रबोधनाचे व्यापक कार्य केले़ संतसाहित्य आणि विचाराने समाजाला सहिष्णुतेची शिकवण दिली, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ़ यु़ म़ पठाण यांनी व्यक्त केले़ जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शिवाजी मध्यवर्ती ग्राहक भांडारच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी ते बोलत होते़ न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे होते़ पठाण म्हणाले, सध्या समाजातील असहिष्णुतेमुळे साहित्यिक पुरस्कार परत करत आहेत़ मात्र, हे पुरस्कार त्यांना यापूर्वीच्या शासनकाळात मिळालेले आहेत़ तरीही समाजातील एकूणच परिस्थतीविरोधात साहित्यिकांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे़ बदलत्या काळानुसार पुण्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू मराठवाड्याकडे सरकत आहे़ चौथे छत्रपतींच्या नावाने साहित्यिकांना पुरस्कार दिल्याने त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली असून, नवोदितांना यातून प्रेरणा मिळेल़ एकेकाळी शासनाकडून त्याच त्या लोकांना पुरस्कार दिले जात होते़ आता मात्र, त्यात बदल झाला असून, ही एक चांगली बाब आहे. डॉ़ सदानंद मोरे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने त्याकाळी मराठी जनतेला मोघल साम्राज्याविरोधात लढ्याची प्रेरणा मिळाली होती़ पुरस्काराचा हा उपक्रम छत्रपतींचा इतिहास पुढे नेईल़ (प्रतिनिधी)पुरस्काराचे मानकरीडॉ़ यु़ म़ पठाण व डॉ़ सदानंद मोरे यांच्या हस्ते डॉ़ खंडेराव शिंदे, डॉ़ राजशेखर सोलापुरे, जयद्रथ जाधव, कवी बाबासाहेब सौदागर, हनुमंत चांदगुडे, डॉ़ संजय कळमकर, डॉ़ बालाजी जाधव यांच्यासह नटवर्य रंगा कामत यांना मरणोत्तर जिल्हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला़