शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

डॉक्टरांची निष्काळजी महापालिकेला भोवली

By admin | Updated: December 23, 2015 02:04 IST

राजावाडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीमुळे हात गमावलेल्या तरुणाला नुकसान भरपाई म्हणून २१ लाख ८२ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले.

मुंबई : राजावाडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीमुळे हात गमावलेल्या तरुणाला नुकसान भरपाई म्हणून २१ लाख ८२ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. तसेच याचिकेच्या खर्चापोटी त्याला एक लाख रुपयेही द्यावे, असा आदेश कोर्टाने दिला.उमाकांत मानेला २००२ मध्ये किरकोळ आजार झाल्याने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे त्याचा हात सुजला. यासंदर्भात उमाकांत आणि त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टर व नर्सना कल्पना दिली. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी उमाकांतला गँगरीन झाला आणि त्याला उजवा हात गमवावा लागला. याविरुद्ध उमाकांतने उच्च न्यायालयात धाव घेतली.डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे व दुर्लक्ष हे घडल्याचे त्याने कोर्टात मांडले. महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी किंवा नोकरी द्यावी, अशी मागणी उमाकांतने याचिकेद्वारे केली. उमाकांत आजारी असताना नोकरी करत होता. आता उजवा हात गमावल्याने तो बेरोजगार झाला आहे. त्यामुळे महापालिकेने त्याला दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला होता.या आदेशाविरुद्ध महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच दिलासा हवा असल्यास पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याची मुभा पालिकेला दिली.त्यानुसार महापालिकेने नुकसान भरपाईची रक्कम कमी करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी होती. निकाल देताना खंडपीठाने डॉक्टरांकडून निष्काळजी झाल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे महापालिकेने उमाकांत मानेला २१ लाख ८२ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच याचिकेवरील खर्च म्हणून एक लाख रुपये देण्याचा आदेश दिला.