शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘खाकी वर्दी’साठी डॉक्टर, वकील, इंजिनियर रांगेत

By admin | Updated: March 11, 2016 04:22 IST

पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतून राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र समोर आले आहे. जवळपास साडेचार हजार जागांसाठी तब्बल साडेसात लाख अर्ज प्राप्त झाले असून केवळ बारावी पास असण्याची

जमीर काझी,  मुंबई पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतून राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र समोर आले आहे. जवळपास साडेचार हजार जागांसाठी तब्बल साडेसात लाख अर्ज प्राप्त झाले असून केवळ बारावी पास असण्याची शैक्षणिक अट असताना देखील डॉक्टर, अभियंते, वकील यांच्यासह अन्य पदवीधारकांनीही अर्ज केले आहेत.सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात पोलीस कॉन्स्टेबलची भरती होत आहे. पोलीस दलातील विविध ६१ घटकांमध्ये एकूण ४ हजार ८३३ कॉन्स्टेबलची पदे भरावयाची आहेत. त्यासाठी ७ लाख ५८ हजार ७२२ अर्ज आले आहेत. यातील ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव असून यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या १ लाख ७३०० इतकी आहे. राज्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत आलेले आहेत.गृह विभागाने इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा तीन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी २५ वरुन २८ वर्षे तर विशेष मागास प्रवर्गात ३० वरून ३३ वर्षे झाली. त्यामुळे केवळ बारावीच नव्हे तर पदवीधर, द्विपदवीधर, बी.एड, एम.एड., डॉक्टर, वकील, इंजिनियर यांनी देखील अर्ज केले. शैक्षणिक पात्रतेपेक्षा आर्थिक स्थैर्याचा विचार करीत ३ डॉक्टर, ३८ वकील व १०६८ अभियंतासह अनेक उच्चशिक्षित युवक आणि युवती अंगावर ‘खाकी’ चढविण्यास तयार झाले आहेत.