शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

‘खाकी वर्दी’साठी डॉक्टर, वकील, इंजिनियर रांगेत

By admin | Updated: March 11, 2016 04:22 IST

पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतून राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र समोर आले आहे. जवळपास साडेचार हजार जागांसाठी तब्बल साडेसात लाख अर्ज प्राप्त झाले असून केवळ बारावी पास असण्याची

जमीर काझी,  मुंबई पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतून राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र समोर आले आहे. जवळपास साडेचार हजार जागांसाठी तब्बल साडेसात लाख अर्ज प्राप्त झाले असून केवळ बारावी पास असण्याची शैक्षणिक अट असताना देखील डॉक्टर, अभियंते, वकील यांच्यासह अन्य पदवीधारकांनीही अर्ज केले आहेत.सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात पोलीस कॉन्स्टेबलची भरती होत आहे. पोलीस दलातील विविध ६१ घटकांमध्ये एकूण ४ हजार ८३३ कॉन्स्टेबलची पदे भरावयाची आहेत. त्यासाठी ७ लाख ५८ हजार ७२२ अर्ज आले आहेत. यातील ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव असून यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या १ लाख ७३०० इतकी आहे. राज्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत आलेले आहेत.गृह विभागाने इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा तीन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी २५ वरुन २८ वर्षे तर विशेष मागास प्रवर्गात ३० वरून ३३ वर्षे झाली. त्यामुळे केवळ बारावीच नव्हे तर पदवीधर, द्विपदवीधर, बी.एड, एम.एड., डॉक्टर, वकील, इंजिनियर यांनी देखील अर्ज केले. शैक्षणिक पात्रतेपेक्षा आर्थिक स्थैर्याचा विचार करीत ३ डॉक्टर, ३८ वकील व १०६८ अभियंतासह अनेक उच्चशिक्षित युवक आणि युवती अंगावर ‘खाकी’ चढविण्यास तयार झाले आहेत.