शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टर होणार कामावर हजर

By admin | Updated: March 24, 2017 16:25 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेण्याची तयार दर्शवली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - उद्या सकाळी 8 वाजता सगळ्या डॉक्टरांनी कामावर हजर व्हावं, अन्यथा सरकारवर त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळीक असेल असा सज्जड इशारा हायकोर्टाने दिल्यावर मार्डने नमतं घेतलं आहे. हायकोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने डॉक्टरांना उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर राहण्याचे निर्देश देत असल्याचे सांगितले. तसेच जे डॉक्टर कामावर हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकार वा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करू शकते असेही मार्डने मान्य केले आहे.
हायकोर्ट तसेच मुख्यमंत्री दोघांनीही संपकरी डॉक्टरांविरोधात ताठ भूमिका घेतल्यानंतर डॉक्टरांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेण्याची तयारी दाखवली होती. सोबतच आपण मार्डलाही संप मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं आश्वासन इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांना झापलं असून 'डॉक्टरांनी आडमुठेपणाची भुमिका सोडावी अथवा त्यांचं संरक्षण करू शकणार नाही. तसंच डॉक्टरांच्या बाबतीत निर्देश बदलावे लागतील', असं स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं .  
मुंबई उच्च न्यायालयाने मार्डला 3 वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता, त्यानंतरही प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास सरकार कारवाई करण्यास मोकळं असेल असं आज सकाळी स्पष्ट केलं होतं. सरकारने कारवाई केल्यास आमची काही हरकत नसणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं. तसेच संप सुरु ठेवल्यास न्यायालयाच्या अवमानाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असंही न्यायालयाने सांगितलं होतं. या सगळ्याचा परिणाम होत अखेर मार्डने सगळे डॉक्टर उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर होतील असं लिहून दिलं आहे. तसेच, जे डॉक्टर कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली तरी त्याची जबाबदारी त्या डॉक्टरांवरच असेल, मार्डवर नसेल असंही संघटनेच्या सचिवांनी नमूद केलं आहे.
 
जर निवासी डॉक्टर कामावर येत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा असा निदर्शे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांच्या संपामुळे सायन रुग्णालयात 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या वकिलाने न्यायालयात दिली आहे. या मुद्यावर तीन वाजता होणा-या सुनावणीत चर्चा केली जाणार आहे.