शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

डॉक्टरांनी घेतली पंडितांची भेट

By admin | Updated: October 20, 2016 03:38 IST

राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी अधिकारी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांची भेट घेऊन व्यथा मांडत आहेत

रवींद्र साळवे,

मोखाडा- राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी अधिकारी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांची भेट घेऊन व्यथा मांडत आहेत, अस्थायी डॉक्टर्स, सफाई कामगार, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका यांच्या नंतर आता पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचे मदत पथक कार्यरत आहे. या पथकाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी विक्रमगड येथे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांची भेट घेतली.या वेळी त्यांनी त्यांच्या व्यथा विवेक पंडित यांच्या समोर मांडल्यात. त्या सोडवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असे सांगून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान असल्याने त्यांच्या न्याय हक्कांच्या लढ्यात मी त्यांना साथ देणार आहे, असे स्पष्ट केले. १९९५ पासून राज्यात हे मदत पथक कार्यरत आहे. विक्र मगड येथील कुर्झे प्राथमिक आरोग्य केंद्रात आज श्रमजीवी संघटना आणि श्री विठु माउली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनासाठी ते विक्रमगड येथे आले असता त्यांच्या समोर आपल्या समस्या व व्यथा डॉक्टरांनी मांडल्या. विवेक पंडित यांनी तात्काळ या बाबत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना कल्पना देऊन या वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात साफ सफाइचे काम करणारे ४८ सफाई कामगार कंत्राटी तत्वावर काम करतात. त्यांना देखील अनेक महीने वेतन नाही जिल्हा परिषद या कर्मचाऱ्यांसाठी १२,५०० रूपये वेतन देते. मात्र ठेकेदार या कर्मचाऱ्यांना केवळ ६,५०० रूपये वेतन देत आहे. हीच अवस्था जिल्हा परिषदेच्या वाहनांवर काम करणाऱ्या कंत्राटी चालकांची आहे. सुट्ट्यांच्या दिवसांवरुनही अडचणी होतात.पालघर जिल्हा परिषदेने ठेके पद्धतीने भाडे तत्वावर ४० वाहने घेतली आहेत. ही वाहन जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. एप्रिल २०१६ पासून या वाहनांचे भाडे देण्यात आलेले नाही. एकूणच जिल्हा परिषदेच्या व्यवस्थेचा पूर्ण बोजवार उडालेला दिसला. आज कुर्झे येथे शिबिरसाठी आलेल्या विवेक पंडित यांची वरील सर्व घटकांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. >एप्रिलपासून वेतन थकलेवावर वांगणी (जव्हार) भागात मोठ्या प्रमाणात बाल मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन सरकारने राज्याच्या दुर्गम आदिवासी भागात काम करण्यासाठी अशा पथकांची स्थापना केली. त्यात आजच्या घडीला १७२ वैद्यकीय अधिकारी पूर्ण राज्यभरात कार्यरत आहेत. पैकी ३१ अधिकारी १९९५ पासून पालघर जिल्ह्यात कार्यरत आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतीही सुरक्षा दिलेली नाही. केंद्र सरकारतर्फे १८ हजार तर राज्यसरकार तर्फे ६ हजार वेतन या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले जाते. एप्रिल २०१६ पासून राज्याच्या हिश्शाचे वेतन या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाही. या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने शासन दरबारी वारंवार मागणी करुन देखील कोणतीही दखल घेतली न गेल्याने अखेर या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विवेक पंडित यांची भेट घेतली.