शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

रुग्णांना ओलीस धरणारे डॉक्टर असंवेदनशील - मुख्यमंत्री

By admin | Updated: March 25, 2017 00:32 IST

हजारो रुग्णांना वाऱ्यावर सोडून असंवेदनशीलता दाखविणारे संपकरी डॉक्टर आणि त्यांना मारहाण करणारे लोक यांच्या मानसिकतेत

मुंबई : हजारो रुग्णांना वाऱ्यावर सोडून असंवेदनशीलता दाखविणारे संपकरी डॉक्टर आणि त्यांना मारहाण करणारे लोक यांच्या मानसिकतेत काय फरक आहे. जनतेच्या करांच्या पैशातून तुम्ही शिकलात, पैसाही घेता. त्यांना ओलीस धरण्याचा तुम्ही करीत असलेला प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मार्डच्या संपकरी डॉक्टरांना ठणकावले. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याच्या मुद्यावरून भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी गदारोळ घातल्याने विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संपावर निवेदन करताना संपकऱ्यांना अक्षरश: खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दिली. तातडीने उपाययोजनादेखील सुरू केल्या. या उपाययोजना १५ दिवसांच्या अमलात आल्या नाहीत तर मी वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. कामावर परत या अशी विनंती आम्ही त्यांना वारंवार केली. त्यांच्या हातापायाही पडलो. अजून काय हवे आहे? अजून किती संयम आम्ही दाखवायचा? या संपाबद्दल सभागृहाच्या आणि राज्यातील जनतेच्याही भावना तीव्र आहेत. डॉक्टर रुग्णांना वाऱ्यावर सोडतील पण सरकार तसे होऊ देणार नाही. राज्य शासनाने डॉक्टरांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या. सर्व प्रकारची कारवाई करण्यासंदर्भात लेखी दिले. उच्च न्यायालयाने देखील संप मागे घेण्याबात निर्णय दिला. तरी देखील डॉक्टर कामावर रु जू झाले नाहीत. त्यांनी घेतलेल्या वैद्यकीय शपथेचा विसर पडलेला दिसतो. ज्या करदात्यांच्या पैशातून डॉक्टरांना शिक्षण दिले जाते त्याच सामान्य माणसाला उपचाराविना मरणासन्न अवस्थेत सोडून देणे कितपत योग्य आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टर शासनाचे, उच्च न्यायालयाचे ऐकायला तयार नाही. संधीचा फायदा घेऊन आपल्या मागण्या रेटण्याचे काम सुरु आहे. हे खपून घेतले जाणार नाही.जाणीवपूर्वक उपचार नाकारले जात असतील तर डॉक्टरांना जबाबदार का धरले जाऊ नये, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.डॉक्टरांनी संवेदनशीलता दाखविली नाही तर राज्य शासन हातावर हात धरु न बसणार नाही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. मुख्यमंत्र्यांच्याच निवेदनाचे भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. समाजाने डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे. मात्र डॉक्टरांची ही असंवेदनशीलता पाहून त्यांना दानवाची उपमा द्यायला नागरिकांना बाध्य व्हावे लागेल, अशी परिस्थिती डॉक्टरच निर्माण करीत आहेत.