शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना विसरलात का?

By admin | Updated: October 8, 2014 21:48 IST

वषार्नंतरही मारेकरी सापडत नाहीत, हे सगळ्याच पक्षांनी नजरेआड केले आहे.

राजीव मुळ्ये - सातारा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा, अयशस्वी तपासाचा आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा निवडणूककाळात सर्वच पक्षांना विसर पडला आहे का, असा उद्विग्न सवाल दाभोलकर कुटुंबीयांनी केला आहे. चांगले काम म्हणून सत्ताधारी जादूटोणाविरोधी कायद्याचा उल्लेख जाहिरातीत करीत नाहीत आणि विरोधक कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणूनसुद्धा हा प्रश्न उचलत नाहीत, याबद्दल कुटुंबीयांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘राजकीय पक्षांचे प्रचाराचे मुद्दे पाहिले असता, ते गंभीरपणे का घ्यावेत, असा प्रश्न मतदारांना पडतो,’ असे निरीक्षण एक नागरिक म्हणून नोंदवून मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘राज्याची प्रगती हा सर्वच पक्षांचा प्रचाराचा मुद्दा आहे. विवेकी विचार करणारी निर्भय माणसे घडविल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. अशी माणसे घडविणाऱ्या डॉक्टरांची हत्या हा प्रगतीच्या मार्गावर आघात आहे, असे कुणालाच वाटू नये, याचा खेद होतो.’ सत्ताधारी आणि विरोधक या दोहोंना हा विषय कसा गैरसोयीचा आहे, हे दाखवून देताना त्या म्हणाल्या, ‘सत्ताधाऱ्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा मुद्दा मांडला, तर तो डॉक्टरांच्या हत्येनंतर विलंबाने केला, हे स्वीकारावे लागेल. शिवाय हल्लेखोरांचा तपास लावण्यात आलेले अपयशही स्वीकारावे लागेल. विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून त्या-त्यावेळी टीका केली; परंतु आता तसे केल्यास कायद्याला विरोध का केला, याचा जाब विचारला जाईल. या कायद्याच्या कचाट्यात सर्वधर्मीय भोंदू सापडले असल्याने कायदा धर्मविरोधी असल्याचा प्रचार चुकीचा होता, हेही त्यांना मान्य करावे लागेल. म्हणून तेही गप्प आहेत. एकंदर सर्वांचीच अडचण आहे.’ डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘तपासाच्या बाबतीत झालेल्या हलगर्जीपणाबद्दल, स्थानिक पातळीवरही कोणत्याच पक्षाचे नेते आता बोलत नाहीत. राज्याला दिशादिग्दर्शन करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा खून होतो, वषार्नंतरही मारेकरी सापडत नाहीत, हे सगळ्याच पक्षांनी नजरेआड केले आहे.राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेते डॉक्टरांच्या हत्येचा विषय टाळत आहेत. प्लँचेट प्रकरणाच्या अहवालाचे पुढे काय झाले, असेही कोणी विचारत नाही. डॉक्टरांच्या नावाने पुरस्कार दिले की जबाबदारी संपते का? मारेकरी का सापडले नाहीत, हे कोण विचारणार?- डॉ. हमीद दाभोलकरफुले, आंबेडकर, शाहू, शिवाजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे, सावरकर यांची नावे सर्वपक्षीय नेते घेत आहेत. राज्याच्या अस्मिता याच नावांभोवती फिरतात. तथापि, विवेकी विचार हे या सर्व महापुरुषांचे वैशिष्ट्य होते, हे सगळेच विसरले आहेत. - मुक्ता दाभोलकरसक्रिय राजकारणाचा सल्ला नाकारलासत्ताधारी आणि विरोधक यांपैकी कोणीही डॉ. दाभोलकरांची हत्या आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा विषय चर्चेत आणणार नाहीत, याची खात्री असलेल्या हितचिंतकांनी प्रमुख नेत्यांविरोधात थेट निवडणूक लढविण्याचा सल्ला दाभोलकर कुटुंबीयांना दिला होता. जय-पराजय नव्हे, तर केवळ डॉक्टरांच्या हत्येच्या विषयावर चर्चा घडवून आणणे हाच उद्देश त्यामागे होता; तथापि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे निवडणुकीच्या पलीकडचे व्यापक राजकारणच असून, निवडणुकीच्या राजकारणात पडायचे नाही, असा निर्णय आपण घेतल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.