शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

मद्यासाठी पाणी देणे बंद करता की आम्ही थांबवू?

By admin | Updated: April 21, 2016 05:18 IST

सध्या राज्यभरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पुढील किमान ४० दिवस मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून राज्यातील तीव्र टंचाईग्रस्त जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जावा

औरंगाबाद : सध्या राज्यभरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पुढील किमान ४० दिवस मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून राज्यातील तीव्र टंचाईग्रस्त जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जावा, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी व्यक्त केली. राज्य सरकार स्वत:हून तसे करणार नसेल तर त्यासाठी आम्हाला अदेश द्यावे लागतील, असेही न्यायालयाने सूचित केले.राज्यभरात नुकताच सराफा व्यापाऱ्यांनी ४१ दिवस बंद पाळला. मात्र, त्यांनी कामगारांना त्यादरम्यानचा पगार दिल्याचे उदाहरण न्यायालयाने दिले व पाणीपुरवठ्याअभावी मद्यनिर्मिती कारखाने बंद राहिले तर तेथील कामगारांनाही पगार दिला जावा, असेही न्यायालयाने सुचविले. राज्य पाणी धोरण २०११ नुसार महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरविण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका कोपरगाव येथील संजय भास्करराव काळे यांनी अ‍ॅड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत केली आहे. त्यावर न्या. एस.एस. शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्यातील भीषण दुष्काळामुळे मे महिन्यातील आयपीएल स्पर्धेचे क्रिकेट सामने राज्याबाहेर हलविण्याचा अंतरिम आदेश देताना न्यायालयाच्या मुंबईतील मुख्य पीठाने, आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असे राज्य सरकारला बजावले होते. बुधवारी औरंगाबादेत मद्य कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यासंबंधीच्या सुनावणीतही न्यायालयाने तीच भावना बोलून दाखविली. (प्रतिनिधी)राज्यात १२९ मद्य कारखानेराज्यात एकूण १२९ मद्यनिर्मिती कारखाने असून, त्यापैकी ९९ कारखाने सध्या चालू आहेत. हे कारखाने देशी आणि विदेशी मद्य, बीअर आणि मद्यार्क तयार करतात. यापैकी औरंगाबादला ११ कारखाने असून, अहमदनगरला १०, नागपूरला १३, नांदेडला २, लातूरला २, उस्मानाबादला २, नाशिकला ९, पुण्याला ७, सोलापूरला १५ कारखाने चालू आहेत, अशी माहिती सरकारतर्फे न्यायालयास दिली गेली.सद्य:स्थितीचा अहवालराज्य शासनाने राज्यातील इतर कारखान्यांचा १० टक्के आणि मद्यनिर्मिती कारखान्यांचा २० टक्के पाणीपुरवठा कपात केला असल्याचे निवेदन करून सरकारी वकील गिरासे यांनी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात प्रामुख्याने औरंगाबाद शहर आणि परिसरातील पाण्याची सद्य:स्थिती काय आहे, याची सविस्तर आकडेवारी देण्यात आली.न्यायालयाचा रोख व व्यक्त केलेली अपेक्षा लक्षात घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी वेळ देण्याची विनंती केली. ती मान्य करून खंडपीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी दुपारी ठेवली.