शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

श्रीरामांच्या विचारांचे आचरण करावे

By admin | Updated: April 29, 2016 02:17 IST

समाजात चांगला आदर्श घालून देण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे.

देहूरोड : समाजात चांगला आदर्श घालून देण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे. रामराज्यात समाज खूप आनंदात व सुखात होता, असे प्रतिपादन श्रीधाम वृंदावन मथुरा येथील पं. आचार्य उत्तम कृष्णशास्त्री यांनी येथे केले. देहूरोड बाजारपेठेतील वैश्य समाजाच्या वतीने वैश्य समाज मंदिराच्या प्रांगणात गेले दहा दिवस सुरू असलेल्या ‘रामकथा महायज्ञा’च्या अंतिम चरणात मेघनाथ, रावण व कुंभकर्ण वध, तसेच राम राज्याभिषेक कथेच्या वेळी शास्त्री बोलत होते. गेल्या सोमवारी मंगल कलशयात्रा व नगरप्रदक्षिणेने भक्तिमय वातावरणात रामकथा महायज्ञाला सुरुवात झाली होती. रामकथा ऐकण्यासाठी देहूरोड परिसरातील भाविकांसह, विशेषत: वैश्य समाज बांधवांची गर्दी अधिक होती. दहा दिवस सुरू असलेल्या सर्व कार्यक्रमांना महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.बुधवारी सकाळपासून मंदिराच्या प्रांगणात महायज्ञ पूर्णाहुती आदी धार्मिक विधी संपन्न झाल्यांनतर व भंडाऱ्याने सोहळ्याची सांगता झाली. दररोजच्या भंडाऱ्यासाठी ( महाप्रसाद ) नरेश अगरवाल, ओमप्रकाश मित्तल अगरवाल, मुकेश व उमेश अगरवाल, कैलास व संदीप गुप्ता, ऊर्मिला बन्सल, सुरेश अगरवाल, ओमप्रकाश अगरवाल, सीतादेवी अगरवाल, नंदकिशोर मित्तल यांनी व्यवस्था केली होती. दहा दिवस परिसरातील हजारो भाविकांनी कार्यक्रमाचा व भंडाऱ्याचा लाभ घेतला. श्रीमद्रामकथेदरम्यान विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, बोर्डाचे उपाध्यक्ष ललित बालघरे, तसेच बोर्डाच्या सर्व सदस्यांनी हजेरी लावली. संयोजन वैश्य समाजाचे अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल, डॉ. श्रीनिवास बन्सल, सुमित अगरवाल, अनिल खंडेलवाल, राहुल बन्सल, सुरेशपाल अगरवाल, नीलेश गुप्ता, रामनिवास अगरवाल यांनी केले. ओमप्रकाश अगरवाल, विनोद अगरवाल, सुरेश बन्सल, दिनेश खंडेलवाल आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)