शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

श्रीरामांच्या विचारांचे आचरण करावे

By admin | Updated: April 29, 2016 02:17 IST

समाजात चांगला आदर्श घालून देण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे.

देहूरोड : समाजात चांगला आदर्श घालून देण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे. रामराज्यात समाज खूप आनंदात व सुखात होता, असे प्रतिपादन श्रीधाम वृंदावन मथुरा येथील पं. आचार्य उत्तम कृष्णशास्त्री यांनी येथे केले. देहूरोड बाजारपेठेतील वैश्य समाजाच्या वतीने वैश्य समाज मंदिराच्या प्रांगणात गेले दहा दिवस सुरू असलेल्या ‘रामकथा महायज्ञा’च्या अंतिम चरणात मेघनाथ, रावण व कुंभकर्ण वध, तसेच राम राज्याभिषेक कथेच्या वेळी शास्त्री बोलत होते. गेल्या सोमवारी मंगल कलशयात्रा व नगरप्रदक्षिणेने भक्तिमय वातावरणात रामकथा महायज्ञाला सुरुवात झाली होती. रामकथा ऐकण्यासाठी देहूरोड परिसरातील भाविकांसह, विशेषत: वैश्य समाज बांधवांची गर्दी अधिक होती. दहा दिवस सुरू असलेल्या सर्व कार्यक्रमांना महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.बुधवारी सकाळपासून मंदिराच्या प्रांगणात महायज्ञ पूर्णाहुती आदी धार्मिक विधी संपन्न झाल्यांनतर व भंडाऱ्याने सोहळ्याची सांगता झाली. दररोजच्या भंडाऱ्यासाठी ( महाप्रसाद ) नरेश अगरवाल, ओमप्रकाश मित्तल अगरवाल, मुकेश व उमेश अगरवाल, कैलास व संदीप गुप्ता, ऊर्मिला बन्सल, सुरेश अगरवाल, ओमप्रकाश अगरवाल, सीतादेवी अगरवाल, नंदकिशोर मित्तल यांनी व्यवस्था केली होती. दहा दिवस परिसरातील हजारो भाविकांनी कार्यक्रमाचा व भंडाऱ्याचा लाभ घेतला. श्रीमद्रामकथेदरम्यान विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, बोर्डाचे उपाध्यक्ष ललित बालघरे, तसेच बोर्डाच्या सर्व सदस्यांनी हजेरी लावली. संयोजन वैश्य समाजाचे अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल, डॉ. श्रीनिवास बन्सल, सुमित अगरवाल, अनिल खंडेलवाल, राहुल बन्सल, सुरेशपाल अगरवाल, नीलेश गुप्ता, रामनिवास अगरवाल यांनी केले. ओमप्रकाश अगरवाल, विनोद अगरवाल, सुरेश बन्सल, दिनेश खंडेलवाल आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)