शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पोलीस बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करतात?

By admin | Updated: May 6, 2015 04:45 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखाते आणि पोलिसांवर भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही टिकास्त्र सोडले आहे.

डोंबिवली : आतापर्यंत मित्रपक्ष शिवसेना व विरोधकांच्याच निशाण्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखाते आणि पोलिसांवर भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही टिकास्त्र सोडले आहे. ह्यमुंबईतील पोलिस राज्यातील बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत,ह्ण असा थेट आरोप केळकर यांनी एका पत्राद्वारे केला आहे. केळकर यांनी २ मे रोजी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बड्या लोकांच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांकडून छळ होत असल्याचे यात नमुद केले आहे. या पत्रातून आमदार केळकर यांनी थेट पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना लक्ष्य करत त्यांचा पोलिसांवर कोणताही वचक नाही,ह्ण असे कळविले आहे. ह्यसिटिझन्स फोरम फॉर सॅनक्टिटी इन एज्युकेशनल सिस्टिमह्णचे प्रा. वैभव नरवडे यांना पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाचा दाखला देऊन केळकर यांनी हे आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. या फोरमच्या माध्यमातून राज्यातील काही शैक्षणिक संस्थातील गैरकारभाराचा पदार्फाश केला होता. त्यांच्या या कामगिरीमुळे तब्बल २९ महाविद्यालयांना टाळे लागल्याचे केळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकारामुळे दुखावलेल्या शिक्षणसम्राटांनी पोलिसांना हाताशी धरून नरवडेंना खोट्या प्रकरणांत गुंतविण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीसही त्यांच्याच इशाऱ्यावर नाचत आहेत, असा केळकर यांचा आरोप आहे. तसेच नरवडे यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)पोलीस यंत्रणेची वस्तुस्थिती मांडलीराज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून फडणवीस यांनी गृहखाते सोडावे अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जात आहे. शिवसेनेनेही अनेकदा गृहखात्यावर टीका केली. आता भाजप आमदारानेच पोलिसांवर टीका केल्याने विरोधकांना बळ मिळण्याची शक्यता आहे. केळकर यांनी मात्र, मुख्यमंत्र्यांकडे गा-हाणे मांडले असून ही त्यांच्यावर टिका नसून पोलिस यंत्रणेचे जे काही सुरु आहे, त्याची वस्तुस्थिती मांडण्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.