शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

दौरे नकोत, पोटाला द्या भाकर !

By admin | Updated: September 20, 2016 03:48 IST

जिल्हा कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.

हितेन नाईक,

पालघर- जिल्हा कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना भेटले. जव्हार मोखाड्यात आता लोकांना रोजगाराची अत्यंत गरज असल्याचे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी पालघर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी या देखील होत्या.सागर वाघ च्या मृत्यू नंतर तब्बल १५ दिवसांनी सागरच्या कुटुंबाला भेटायला गेलेल्या आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना मयत सागर च्या आईने अक्षरश: हाकलून दिले होते. त्यानंतर या प्रश्नाने सरकारवर चारी बाजूनी हल्लाबोल झाला होता. राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते तातडीने मोखाड्यात एकाच गावात एकाच वेळी भेटीला येण्याची ऐतिहासिक घटना घडली. याबाबत आता श्रमजीवी आंदोलनाच्या आक्र मकतेसोबत कृतीत देखील अधिक आक्र मक झाली आहे. १६ तारखेपासून श्रमजीवी संघटनेचे ३०० युवक कार्यकर्ते मोखाड्यातील गावागावात फिरून तेथील समस्या समजून घेत आहेत. गेल्या ३ दिवसात या युवकांनी केलेल्या सर्वेक्षणात लोकांनी सांगितले आम्हाला मंत्र्यांचे दौरे नको, हाताला काम आणि पोटाला भाकर हवी आहे. म्हणूनच श्रमजीवी चे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या युवक पथकाने रोजगार मागणीचे अर्ज देखील भरून घेतले. आणि आज हे अर्ज मोखाडा तहसीलदारांकडे सुपूर्द केले. याच अर्जाची तात्काळ दाखल घेऊन अतितातडीने प्रशासनाने रोहयो ची कामे सुरू करावी याबाबत या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी तात्काळ या बाबत संबंधितांना सूचना केल्या आणि शक्य तितक्या लवकर हि कामे सुरू करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. येथिल आदिवासी, कातकरी बांधवांच्या घरात दोन दिवसाचेही खायला नसल्याची बाब श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणू दिली. यावेळी याभागातील आदीवासी कातकरी कुटुंबाना तात्काळ अंत्योदय योजनेच्या शिधा पत्रिका देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सी तहसीलदार आणि पुरवठा विभागाला दिल्या. या शिष्टमंडळात श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, दिनेश पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थितहोते. (वार्ताहर)