शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो पुराने दिन - शरद पवार

By admin | Updated: October 31, 2015 21:09 IST

युती सरकारच्या काऴात राज्यात सध्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्यात आता नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ -  युती सरकारच्या काऴात राज्यात सध्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्यासहीत देशात आता नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो पुराने दिन असे म्हणणाची वेऴ आली आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार जोरदार टीका केली. आज मुंबईत राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली, यावेळी शरद पवार बोलत होते. 
 
राष्ट्रवादीच्या जाहीर सभेतील शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे - 
- आमच्या सरकारने सत्ता सोडली तेव्हा डाळीचे भाव कमी होते. 
- आमच्या कार्यकाळात ७० रुपये डाळ होती, तीच आता २३० च्यावर पोहचली आहे.  
- डाळ भाव कमी करण्यास व्यापारी तयार आहेत, मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना साथ देत नाही. 
- मुंबईतील समुद्रात डाळ घेऊन आलेल्या जहाजांना परवानगी दिली नाही.   
- राज्यात सध्याची स्थिती वाईट आहे, कांदा उत्पादन शेतक-यांना वा-यावर आहेत.
- आमची सामान्य लोकांशी बांधिलकी होती. 
- राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट केली. 
- राज्यात सर्वाधिक अत्याचार, खून आणि दरोडे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच होत आहेत. 
- राज्यात कुणीही दहशतवाद पसरवत असेल तर जबाबदारी सरकारने घ्यायची असते.
- देशात ज्यावेळी सरदार पटेल गृहमंत्री होते, त्यावेळी संघावर बंदी होती. 
- कामगार - कष्टक-यांची बिकट परिस्थिती आहे, शेतक-यांची- ग्राहकांची लूट होत आहे.
 - समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम जातीयवादी करत आहेत, त्यांच्या पाठीशी सरकार असल्यानेच त्यांची हिंमत वाढली आहे. 
- नरेंद्र मोदींनी लोकांची परीक्षा पाहू नये, तुम्हाला बाहेर काढायला त्यांना वेळ लागणार नाही.