शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
2
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
3
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
4
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
5
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
6
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
7
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
8
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
9
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
10
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
11
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
12
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
13
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
14
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
15
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
16
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
17
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
18
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
19
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो पुराने दिन - शरद पवार

By admin | Updated: October 31, 2015 21:09 IST

युती सरकारच्या काऴात राज्यात सध्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्यात आता नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ -  युती सरकारच्या काऴात राज्यात सध्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्यासहीत देशात आता नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो पुराने दिन असे म्हणणाची वेऴ आली आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार जोरदार टीका केली. आज मुंबईत राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली, यावेळी शरद पवार बोलत होते. 
 
राष्ट्रवादीच्या जाहीर सभेतील शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे - 
- आमच्या सरकारने सत्ता सोडली तेव्हा डाळीचे भाव कमी होते. 
- आमच्या कार्यकाळात ७० रुपये डाळ होती, तीच आता २३० च्यावर पोहचली आहे.  
- डाळ भाव कमी करण्यास व्यापारी तयार आहेत, मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना साथ देत नाही. 
- मुंबईतील समुद्रात डाळ घेऊन आलेल्या जहाजांना परवानगी दिली नाही.   
- राज्यात सध्याची स्थिती वाईट आहे, कांदा उत्पादन शेतक-यांना वा-यावर आहेत.
- आमची सामान्य लोकांशी बांधिलकी होती. 
- राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट केली. 
- राज्यात सर्वाधिक अत्याचार, खून आणि दरोडे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच होत आहेत. 
- राज्यात कुणीही दहशतवाद पसरवत असेल तर जबाबदारी सरकारने घ्यायची असते.
- देशात ज्यावेळी सरदार पटेल गृहमंत्री होते, त्यावेळी संघावर बंदी होती. 
- कामगार - कष्टक-यांची बिकट परिस्थिती आहे, शेतक-यांची- ग्राहकांची लूट होत आहे.
 - समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम जातीयवादी करत आहेत, त्यांच्या पाठीशी सरकार असल्यानेच त्यांची हिंमत वाढली आहे. 
- नरेंद्र मोदींनी लोकांची परीक्षा पाहू नये, तुम्हाला बाहेर काढायला त्यांना वेळ लागणार नाही.