ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - युती सरकारच्या काऴात राज्यात सध्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्यासहीत देशात आता नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो पुराने दिन असे म्हणणाची वेऴ आली आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार जोरदार टीका केली. आज मुंबईत राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली, यावेळी शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादीच्या जाहीर सभेतील शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे -
- आमच्या सरकारने सत्ता सोडली तेव्हा डाळीचे भाव कमी होते.
- आमच्या कार्यकाळात ७० रुपये डाळ होती, तीच आता २३० च्यावर पोहचली आहे.
- डाळ भाव कमी करण्यास व्यापारी तयार आहेत, मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना साथ देत नाही.
- मुंबईतील समुद्रात डाळ घेऊन आलेल्या जहाजांना परवानगी दिली नाही.
- राज्यात सध्याची स्थिती वाईट आहे, कांदा उत्पादन शेतक-यांना वा-यावर आहेत.
- आमची सामान्य लोकांशी बांधिलकी होती.
- राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट केली.
- राज्यात सर्वाधिक अत्याचार, खून आणि दरोडे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच होत आहेत.
- राज्यात कुणीही दहशतवाद पसरवत असेल तर जबाबदारी सरकारने घ्यायची असते.
- देशात ज्यावेळी सरदार पटेल गृहमंत्री होते, त्यावेळी संघावर बंदी होती.
- कामगार - कष्टक-यांची बिकट परिस्थिती आहे, शेतक-यांची- ग्राहकांची लूट होत आहे.
- समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम जातीयवादी करत आहेत, त्यांच्या पाठीशी सरकार असल्यानेच त्यांची हिंमत वाढली आहे.
- नरेंद्र मोदींनी लोकांची परीक्षा पाहू नये, तुम्हाला बाहेर काढायला त्यांना वेळ लागणार नाही.