शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इष़़ !

By admin | Updated: January 19, 2016 03:17 IST

‘शीक बाबा शीक, लढायला शीक कुणब्याच्या पोरा, आता लढायला शीक

नीलेश जंगम,ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)‘शीक बाबा शीक, लढायला शीककुणब्याच्या पोरा, आता लढायला शीकलाजरेपणा, बुजरेपणा बाजारात इकघेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इषमागं-मागं नको, पुढं सरायला शीकआत्महत्या नको, हत्या करायला शीक,’शेतकऱ्यांची एक पिढी आत्महत्या करून मेली. आताच्या शेतकऱ्यांना आत्महत्या न करता लढायला शिका, असे सांगणाऱ्या इंद्रजित भालेराव यांच्या या कवितेला श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली. ‘ज्ञानोबा-तुकारामनगरी’तील ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या चौथ्या दिवशी मंगेश पाडगावकर सभागृहात (मुख्य मंडपात) सोमवारी सकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विपरीत अवस्थेबद्दल कविता सादर करताना भालेराव यांना रसिकांनी टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली. या संमेलनात ३५ कवींनी सहभाग घेतला होता. त्यांपैकी संस्कार कुडाळकर या लहान मुलाने ‘आठवण येता तुझी आई, कोणास सांगू व्यथा? मातृछत्रपण हरवून गेले, उजाड माझा माथा’ ही कविता सादर केली व अनेकांचे डोळे पाणावले. १२वीला शिकणारी प्रतीक्षा इंगळे हिने स्त्रीभ्रूणहत्येवर आधारित कविता सादर केली. दासू वैद्य अध्यक्षस्थानी होते.‘माझ्या गळ्याभोवती नातवाचे हात आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवातघरभर सांडलेले बोबडे बोलनातवाच्या शब्दाला करोडोचे मोलनातू जिवलग मित्र, नात माझी काठीवाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटीहीच एक इच्छा राहिली मनात,आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात’ ही कविता लातूरचे योगिराज माने यांनी सादर करून अनेक ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली. वसईच्या संगीता अरबुणे यांनी ‘मुली बदलल्या आहेत खूपशा’, गुहागर येथून आलेले ईश्वर हलगरे यांनी ‘ खांदा आणि झूल’, हेमलता पाटील यांनी ‘पाहतच नसतो आपण वाट’ या कवितेच्या माध्यमातून विधवा स्त्रीची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. अशोक कुभांर यांनी ‘शहानपण’, गिरीश सपाटे यांनी ‘घर’, विष्णू सोळुंखे यांनी ‘पावसाने असे रोज येऊ नये’ अशा कविता सादर करून मने जिंकली. महेश मोरे यांनी ‘तुझ्या हंगामाला आभाळभर शुभेच्छा’ ही हृदयाला स्पर्श करणारी कविता सादर केली. ‘यशाचा सुगंध’ ही स्त्रीसंदर्भातील आशादायी कविता डॉ. सुमन नवलकर यांनी म्हटली. ठाण्याचे किरण येले यांनी ‘माझ्या लक्षात आलंय’ ही कविता सादर केली. रमण रणदिवे यांनी ‘प्रसंग एखादा’ ही गझल सादर केली. त्याला काव्यरसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. कल्पना दुधाळ यांनी सादर केलेल्या ‘गाभाच पोखरलाय फक्त’ या कवितेतून स्त्रीजीवनावर कठोर भाष्य केले. सतीश सोळांकुरकर यांनी ‘मुंग्यांची रांग सरकत’ या कवितेतून हसविले. कविता बोरवणकर यांनी ‘लिबलिबित घराच्या बाहेरील जग’ या कवितेतून स्त्रीजाणिवा मांडल्या.अष्टीचे सय्यद अल्लाउद्दीन यांनी ‘असे आम्ही कवी सत्याग्रही’ ही दमदार कविता खड्या आवाजात सादर केली. विष्णू सोळुंखे यांच्या गझलेला दाद मिळाली. सत्यपालसिंग राजपूत यांंनी ‘सुखाची गोष्ट’तून मृत्यूविषयक चिंतन मांडले. प्रवीण दवणे, इंदूरच्या मीनाक्षी पाटील, सुहास येवलेकर, प्रशांत असनारे, संघमित्रा खंडारे, शिवाजी चाळक, संदीपान पवार, अनिल लक्ष्मण राव, अशोक कुंभार, अलकनंदा साने यांच्या कवितांना दादा मिळाली़ दीपेश सुराणा, भूषण नांदरवार, दुर्गेश सोनार, संजय ऐलवाड या पत्रकारांनीही कविसंमेलनात सहभाग घेऊन उत्कृष्ट कविता सादर केल्या. अंजली कुलकर्णी यांनी निवेदन केले.