शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

पावसाळ्याची वाट बघू नका, रस्ते दुरुस्ती करा

By admin | Updated: January 31, 2015 05:23 IST

पावसाळ्याची वाट न बघता रस्ते दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या, असे बजावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका व राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़

मुंबई : पावसाळ्याची वाट न बघता रस्ते दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या, असे बजावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका व राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़चांगले रस्ते व पायाभूत सुविधा देणे ही पालिका व शासनाची मुख्य घटनात्मक जबाबदारी आहे़ त्यामुळे केवळ पावसाळ्यातच खड्डे अधिक असतात, म्हणून तेव्हाच तत्परतेने काम करायचे हे पूर्णपणे गैर आहे, असे खडेबोलही न्यायालयाने यावेळी सुनावले़ तसेच यासाठी ठोस धोरण आखून त्याचा कृती अहवाल न्यायालयात सादर करा, असे आदेश देखील न्यायालयाने पालिकेला दिले आहेत़ खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने या समस्येकडे न्यायालयाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती करणारे पत्र न्या़ गौतम पटेल यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना लिहिले होते़ त्याची दखल घेत न्यायालयाने मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा सुनावणीसाठी सुओमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतला़ यावरील सुनावणीत गेल्यावर्षी न्यायालयाने चांगले रस्ते करण्यासाठी ठोस धोरण आखण्याचे आदेश पालिकेला दिले होते़मात्र, पालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी केवळ पावसाळ्यातच येत असतात़ तेव्हा त्याची दखल घेतली जाते, असे न्यायालयाला सांगितले़ पण खड्ड्यांसाठी पालिकेची वेबसाईट वर्षभर कार्यरत असते, असे शासनाने न्यायालयात स्पष्ट केले़तसेच अ‍ॅड़ रूजू ठक्कर यांनी सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ सध्या मुलुंडहून दक्षिण मुंबईत येण्यासाठी किमान दोन तास लागतात़ कारण या मार्गावर रस्त्यांची कामे सुरू आहेत़ तेव्हा याबाबत न्यायालयाने योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड़ ठक्कर यांनी केली़त्यावर न्यायालयाने शासन व पालिकेला चांगलेच फैलावर घेतले व याबाबत ठोस धोरण आखण्याचे निर्देश दिले़ (प्रतिनिधी)