शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

पावसाळ्याची वाट बघू नका, रस्ते दुरुस्ती करा

By admin | Updated: January 31, 2015 05:23 IST

पावसाळ्याची वाट न बघता रस्ते दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या, असे बजावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका व राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़

मुंबई : पावसाळ्याची वाट न बघता रस्ते दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या, असे बजावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका व राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़चांगले रस्ते व पायाभूत सुविधा देणे ही पालिका व शासनाची मुख्य घटनात्मक जबाबदारी आहे़ त्यामुळे केवळ पावसाळ्यातच खड्डे अधिक असतात, म्हणून तेव्हाच तत्परतेने काम करायचे हे पूर्णपणे गैर आहे, असे खडेबोलही न्यायालयाने यावेळी सुनावले़ तसेच यासाठी ठोस धोरण आखून त्याचा कृती अहवाल न्यायालयात सादर करा, असे आदेश देखील न्यायालयाने पालिकेला दिले आहेत़ खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने या समस्येकडे न्यायालयाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती करणारे पत्र न्या़ गौतम पटेल यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना लिहिले होते़ त्याची दखल घेत न्यायालयाने मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा सुनावणीसाठी सुओमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतला़ यावरील सुनावणीत गेल्यावर्षी न्यायालयाने चांगले रस्ते करण्यासाठी ठोस धोरण आखण्याचे आदेश पालिकेला दिले होते़मात्र, पालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी केवळ पावसाळ्यातच येत असतात़ तेव्हा त्याची दखल घेतली जाते, असे न्यायालयाला सांगितले़ पण खड्ड्यांसाठी पालिकेची वेबसाईट वर्षभर कार्यरत असते, असे शासनाने न्यायालयात स्पष्ट केले़तसेच अ‍ॅड़ रूजू ठक्कर यांनी सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ सध्या मुलुंडहून दक्षिण मुंबईत येण्यासाठी किमान दोन तास लागतात़ कारण या मार्गावर रस्त्यांची कामे सुरू आहेत़ तेव्हा याबाबत न्यायालयाने योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड़ ठक्कर यांनी केली़त्यावर न्यायालयाने शासन व पालिकेला चांगलेच फैलावर घेतले व याबाबत ठोस धोरण आखण्याचे निर्देश दिले़ (प्रतिनिधी)