शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: December 6, 2015 20:10 IST

गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ६ - गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही, दुष्काळी परिस्थिती ओळखून आधीच उपाययोजना सुरु केल्या होत्या, शिवाय, केंद्राला आपला प्रस्ताव वेळेत गेला आहे असे मत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत मांडले. हिवाळी अधिवेशनाआधी होणारा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर लांबणीवर पडला आहे.  मंत्रीमंडळाचा विस्तार राज्यातील हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरवात होत आहे. ठाणेतील प्रसिद्ध बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणी विरोधकांनी पुरावे द्यावेत, दुष्काळाचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे  असा टोला त्यांनी विरोधकाला लगावला. तर राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण घटल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केला.
 
राज्यातील एकाही घटकाचे समाधान न करू शकणा-या अपयशी सरकार सोबत चहापान कशाला घ्यायचे असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, महागाई, विदर्भ विकास, डाळ घोटाळा, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगीतले.
 
>मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
> यंदा राज्यात डाळींच्या उत्पन्नात ३५ टक्क्यांनी घट झाली आहे
> दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना, मदतीसाठी केंद्राची वाट पाहणार नाही
> महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासंदर्भात व्यक्त केलेलं मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे
> विरोधकांना चर्चा नव्हे तर राजकारण करावे 
> दुष्काळाचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे