शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: December 6, 2015 20:10 IST

गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ६ - गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही, दुष्काळी परिस्थिती ओळखून आधीच उपाययोजना सुरु केल्या होत्या, शिवाय, केंद्राला आपला प्रस्ताव वेळेत गेला आहे असे मत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत मांडले. हिवाळी अधिवेशनाआधी होणारा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर लांबणीवर पडला आहे.  मंत्रीमंडळाचा विस्तार राज्यातील हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरवात होत आहे. ठाणेतील प्रसिद्ध बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणी विरोधकांनी पुरावे द्यावेत, दुष्काळाचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे  असा टोला त्यांनी विरोधकाला लगावला. तर राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण घटल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केला.
 
राज्यातील एकाही घटकाचे समाधान न करू शकणा-या अपयशी सरकार सोबत चहापान कशाला घ्यायचे असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, महागाई, विदर्भ विकास, डाळ घोटाळा, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगीतले.
 
>मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
> यंदा राज्यात डाळींच्या उत्पन्नात ३५ टक्क्यांनी घट झाली आहे
> दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना, मदतीसाठी केंद्राची वाट पाहणार नाही
> महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासंदर्भात व्यक्त केलेलं मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे
> विरोधकांना चर्चा नव्हे तर राजकारण करावे 
> दुष्काळाचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे