शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

निवडणुकीत मैत्री नको युद्ध करा

By admin | Updated: May 11, 2015 05:01 IST

निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला.

पुणे : राजकारणात काम करत असताना स्वपक्ष व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांशी मैत्री ठेवावी. अगदी वर्षांतील ३६४ दिवस मैत्री केली तरी चालेल, पण निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या एकसष्ठीनिमित्ताने पवार यांच्या हस्ते काकडे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब.मुझुमदार अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण, हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, बाळा नांदगावकर, निवेदिता माने आदी उपस्थित होते.राजकीय क्षेत्रात काम करता सर्वपक्षीय मैत्री असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. मात्र, महाराष्ट्रवगळता काही राज्यात राजकीय वर्चस्वासाठी एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार होतात. परंतु, पुण्यात वेगवेगळ््या पक्षात राहून गिरीश बापट,अंकुश काकडे व शांतीलाल सुरतवाला (गॅस) यांनी मैत्री जपली. परंतु, निवडणुकीच्या काळात मैत्री ठेवून चालणार नाही. तसे असते, तर महाभारत व रामायण घडले नसते. अर्जुनालाही त्याच्या सग्यासोयऱ्यांबरोबर लढावे लागले होते. त्यामुळे युद्धावेळी समोरच्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय तुम्ही पुढे शकत नाही, अशी सल्ला पवार यांनी दिला. तसेच, पुण्यातील धोरणात्मक निर्णयावेळी मीही अंकुशचे मार्गदर्शन घेतो,अशी कबुली त्यांनी दिली. (प्रतिनिधी)