शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत मैत्री नको युद्ध करा

By admin | Updated: May 11, 2015 05:01 IST

निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला.

पुणे : राजकारणात काम करत असताना स्वपक्ष व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांशी मैत्री ठेवावी. अगदी वर्षांतील ३६४ दिवस मैत्री केली तरी चालेल, पण निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या एकसष्ठीनिमित्ताने पवार यांच्या हस्ते काकडे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब.मुझुमदार अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण, हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, बाळा नांदगावकर, निवेदिता माने आदी उपस्थित होते.राजकीय क्षेत्रात काम करता सर्वपक्षीय मैत्री असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. मात्र, महाराष्ट्रवगळता काही राज्यात राजकीय वर्चस्वासाठी एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार होतात. परंतु, पुण्यात वेगवेगळ््या पक्षात राहून गिरीश बापट,अंकुश काकडे व शांतीलाल सुरतवाला (गॅस) यांनी मैत्री जपली. परंतु, निवडणुकीच्या काळात मैत्री ठेवून चालणार नाही. तसे असते, तर महाभारत व रामायण घडले नसते. अर्जुनालाही त्याच्या सग्यासोयऱ्यांबरोबर लढावे लागले होते. त्यामुळे युद्धावेळी समोरच्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय तुम्ही पुढे शकत नाही, अशी सल्ला पवार यांनी दिला. तसेच, पुण्यातील धोरणात्मक निर्णयावेळी मीही अंकुशचे मार्गदर्शन घेतो,अशी कबुली त्यांनी दिली. (प्रतिनिधी)