शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

आमच्या पाण्याला हात लावू नका

By admin | Updated: April 29, 2016 00:40 IST

पुणेकरांनी एक दिवसाआड पाणीकपात करून वाचविलेले पाणी इतरांना देता येणार नाही.

पुणे : पुणेकरांनी एक दिवसाआड पाणीकपात करून वाचविलेले पाणी इतरांना देता येणार नाही. शहराला ३१ जुलैपर्यंत इतका पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक राहिलाच पाहिजे, असा निर्णय महापालिकेमध्ये गुरुवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची लेखी माहिती पालकमंत्री गिरीश बापट व जिल्हाधिकारी सौरभ राव यांना कळविण्यात आली आहे.शहराच्या पाण्यातून दौंडला पाणी देण्याबाबत महापालिकेने विचार करावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी करण्यात आली होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी तातडीने पक्षनेत्यांची बैठक बोलावली. दौंडला जादाचे पाणी सोडण्यास पक्षनेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्यानुसार पुण्याला ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका साठा धरणामध्ये ठेवलाच पाहिजे, त्यातून कोणालाही पाणी देण्यात येऊ नये, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.मागील वेळेस जुलैनंतर पाऊस झाला होता. या वेळेसही जर पावसाला उशीर झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ३ लाख लोकसंख्येच्या लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करता येऊ शकला; मात्र जर ३५ लाख लोकसंख्येच्या पुण्याच्या प्रश्न निर्माण झाला तर काय व्यवस्था करणार, असा प्रश्न जगताप यांनी या वेळी उपस्थित केला.>कालवा दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये देणार नाहीखडकवासला धरणापासून पर्वती जलकेंद्राला पाणीपुरवठा करणारा कॅनॉल अनेक दिवसांपासून गळत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याचा २ कोटी रुपयांचा खर्च पुणे महापालिकेने उचलावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. यावर गुरुवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. महापालिकेने पाटबंधारे विभागाकडून घेतलेल्या पाण्याची पाणीपट्टी नियमित भरली आहे. तसेच यापुढील काळात या कालव्याचा वापर शहराच्या पाण्यासाठी होणार नाही. त्यामुळे कालवा दुरुस्तीसाठी महापालिकेकडून कोणतेही पैसे द्यायचे नाहीत, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.