शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

त्यांना काश्मिरातील असहिष्णुता दिसत नाही काय?

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

इंद्रेशकुमारजी यांचा सवाल : तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेचा समारोप

कोल्हापूर : काश्मीरमध्ये टोकाचा भारतद्वेष केला जातो, राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, ही असहिष्णुता विचारवंत आणि कलाकारांना दिसत नाही काय? असा परखड सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमारजी यांनी शुक्रवारी येथे केला.ब्राह्मण सभा करवीर व महालक्ष्मी बँकेतर्फे प्रायव्हेट हायस्कूल सभागृहात आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत ‘काश्मीर-समस्या आणि समाधान’ या विषयावर बोलत होते. या व्याख्यानमालेचा शुक्रवारी समारोप झाला.इंद्रेशकुमारजी म्हणाले, जगातील सर्वांत मोठे संविधान असणारे भारत हे एकमेव राष्ट्र आहे, तसेच तात्पुरत्या स्वरुपातील ‘३७० कलम’ लागू असणारेही एकमेव राष्ट्र आहे. हे कलम तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी लागू केले. या कलमाने काश्मीरमध्ये भारतीय कायदा व संसदेचा कोणताही निर्णय लागू होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान झाला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई भारत सरकारला करता येत नाही. भारतीय संविधानातील अनेक कायदे अजूनही तेथे लागू होत नसल्याने आपल्याला उघड्या डोळ्यांनी भारतमातेचा व राष्ट्रध्वजाचा अवमान बघावा लागत आहे. याला काय सहिष्णुता म्हणायची काय? ही असहिष्णुता देशातील विचारवंत आणि कलाकारांना का दिसत नाही?ते म्हणाले, ‘३७० कलमा’मुळे आपण आतापर्यंत काय कमावले आणि गमावले? या विषयावर चर्चा करायला देशातील धर्मनिरपेक्ष नेते व कम्युनिस्ट नेते तयार नाहीत. संविधानाची पायमल्ली करून देशाचे तुकडे करायला लावणाऱ्या या कलमाचा कर्करोगासोबत घेऊन आपण आतापर्यंत का राहत आहोत, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे मालक जर महात्मा गांधी आणि पंडित नेहरू असतील, तर त्याच्या आदल्या दिवशी झालेल्या भारत-पाक विभाजनाचे मालकही तेच आहेत. करोडो लोकांच्या बलिदानानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आताही काश्मीरच्या सीमेवर जवान देशासाठी बलिदान देत आहेत. जो देश बलिदान समजून घेत नाही, तो देश भटकत राहतो. या सत्याला देशाने जाणले पाहिजे. भारताने पाकिस्तान आणि चीनविरोधात अनेक युद्धे करून ती जिंकली. आता या युद्धाऐवजी दहशतवादाचा अवलंब होत आहे. या युद्धासाठी होणाऱ्या खर्चाच्या दहापट खर्च हा दहशतवादासाठी होतोय, ही सद्य:स्थिती आहे.यावेळी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, भालचंद्र अष्टेकर, हरिश्चंद्र अष्टेकर, महेश धर्माधिकारी, संदीप कुलकर्णी, सुहास तेंडुलकर, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, नंदकुमार मराठे, श्रीकांत लिमये आदी उपस्थित होते. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)