शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

त्यांना काश्मिरातील असहिष्णुता दिसत नाही काय?

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

इंद्रेशकुमारजी यांचा सवाल : तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेचा समारोप

कोल्हापूर : काश्मीरमध्ये टोकाचा भारतद्वेष केला जातो, राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, ही असहिष्णुता विचारवंत आणि कलाकारांना दिसत नाही काय? असा परखड सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमारजी यांनी शुक्रवारी येथे केला.ब्राह्मण सभा करवीर व महालक्ष्मी बँकेतर्फे प्रायव्हेट हायस्कूल सभागृहात आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत ‘काश्मीर-समस्या आणि समाधान’ या विषयावर बोलत होते. या व्याख्यानमालेचा शुक्रवारी समारोप झाला.इंद्रेशकुमारजी म्हणाले, जगातील सर्वांत मोठे संविधान असणारे भारत हे एकमेव राष्ट्र आहे, तसेच तात्पुरत्या स्वरुपातील ‘३७० कलम’ लागू असणारेही एकमेव राष्ट्र आहे. हे कलम तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी लागू केले. या कलमाने काश्मीरमध्ये भारतीय कायदा व संसदेचा कोणताही निर्णय लागू होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान झाला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई भारत सरकारला करता येत नाही. भारतीय संविधानातील अनेक कायदे अजूनही तेथे लागू होत नसल्याने आपल्याला उघड्या डोळ्यांनी भारतमातेचा व राष्ट्रध्वजाचा अवमान बघावा लागत आहे. याला काय सहिष्णुता म्हणायची काय? ही असहिष्णुता देशातील विचारवंत आणि कलाकारांना का दिसत नाही?ते म्हणाले, ‘३७० कलमा’मुळे आपण आतापर्यंत काय कमावले आणि गमावले? या विषयावर चर्चा करायला देशातील धर्मनिरपेक्ष नेते व कम्युनिस्ट नेते तयार नाहीत. संविधानाची पायमल्ली करून देशाचे तुकडे करायला लावणाऱ्या या कलमाचा कर्करोगासोबत घेऊन आपण आतापर्यंत का राहत आहोत, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे मालक जर महात्मा गांधी आणि पंडित नेहरू असतील, तर त्याच्या आदल्या दिवशी झालेल्या भारत-पाक विभाजनाचे मालकही तेच आहेत. करोडो लोकांच्या बलिदानानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आताही काश्मीरच्या सीमेवर जवान देशासाठी बलिदान देत आहेत. जो देश बलिदान समजून घेत नाही, तो देश भटकत राहतो. या सत्याला देशाने जाणले पाहिजे. भारताने पाकिस्तान आणि चीनविरोधात अनेक युद्धे करून ती जिंकली. आता या युद्धाऐवजी दहशतवादाचा अवलंब होत आहे. या युद्धासाठी होणाऱ्या खर्चाच्या दहापट खर्च हा दहशतवादासाठी होतोय, ही सद्य:स्थिती आहे.यावेळी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, भालचंद्र अष्टेकर, हरिश्चंद्र अष्टेकर, महेश धर्माधिकारी, संदीप कुलकर्णी, सुहास तेंडुलकर, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, नंदकुमार मराठे, श्रीकांत लिमये आदी उपस्थित होते. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)