शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

त्यांना काश्मिरातील असहिष्णुता दिसत नाही काय?

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

इंद्रेशकुमारजी यांचा सवाल : तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेचा समारोप

कोल्हापूर : काश्मीरमध्ये टोकाचा भारतद्वेष केला जातो, राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, ही असहिष्णुता विचारवंत आणि कलाकारांना दिसत नाही काय? असा परखड सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमारजी यांनी शुक्रवारी येथे केला.ब्राह्मण सभा करवीर व महालक्ष्मी बँकेतर्फे प्रायव्हेट हायस्कूल सभागृहात आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत ‘काश्मीर-समस्या आणि समाधान’ या विषयावर बोलत होते. या व्याख्यानमालेचा शुक्रवारी समारोप झाला.इंद्रेशकुमारजी म्हणाले, जगातील सर्वांत मोठे संविधान असणारे भारत हे एकमेव राष्ट्र आहे, तसेच तात्पुरत्या स्वरुपातील ‘३७० कलम’ लागू असणारेही एकमेव राष्ट्र आहे. हे कलम तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी लागू केले. या कलमाने काश्मीरमध्ये भारतीय कायदा व संसदेचा कोणताही निर्णय लागू होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान झाला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई भारत सरकारला करता येत नाही. भारतीय संविधानातील अनेक कायदे अजूनही तेथे लागू होत नसल्याने आपल्याला उघड्या डोळ्यांनी भारतमातेचा व राष्ट्रध्वजाचा अवमान बघावा लागत आहे. याला काय सहिष्णुता म्हणायची काय? ही असहिष्णुता देशातील विचारवंत आणि कलाकारांना का दिसत नाही?ते म्हणाले, ‘३७० कलमा’मुळे आपण आतापर्यंत काय कमावले आणि गमावले? या विषयावर चर्चा करायला देशातील धर्मनिरपेक्ष नेते व कम्युनिस्ट नेते तयार नाहीत. संविधानाची पायमल्ली करून देशाचे तुकडे करायला लावणाऱ्या या कलमाचा कर्करोगासोबत घेऊन आपण आतापर्यंत का राहत आहोत, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे मालक जर महात्मा गांधी आणि पंडित नेहरू असतील, तर त्याच्या आदल्या दिवशी झालेल्या भारत-पाक विभाजनाचे मालकही तेच आहेत. करोडो लोकांच्या बलिदानानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आताही काश्मीरच्या सीमेवर जवान देशासाठी बलिदान देत आहेत. जो देश बलिदान समजून घेत नाही, तो देश भटकत राहतो. या सत्याला देशाने जाणले पाहिजे. भारताने पाकिस्तान आणि चीनविरोधात अनेक युद्धे करून ती जिंकली. आता या युद्धाऐवजी दहशतवादाचा अवलंब होत आहे. या युद्धासाठी होणाऱ्या खर्चाच्या दहापट खर्च हा दहशतवादासाठी होतोय, ही सद्य:स्थिती आहे.यावेळी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, भालचंद्र अष्टेकर, हरिश्चंद्र अष्टेकर, महेश धर्माधिकारी, संदीप कुलकर्णी, सुहास तेंडुलकर, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, नंदकुमार मराठे, श्रीकांत लिमये आदी उपस्थित होते. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)