शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

गोव्याची महती सांगू नका

By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST

नारायण राणे : कणकवलीतील प्रचारसभेत मोदींवर टीका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध  असून गोवा राज्याला या जिल्ह्यातूनच तिलारी धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गोव्याची महती सांगू नये. येथील विकास नियोजनबद्धरित्या सुरु असून गोव्यासारखा विकास आम्हाला नको आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते व प्रचार समितीप्रमुख नारायण राणे यांनी केले.कणकवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारासाठी येथील हॉटेल सह्याद्रीसमोर सोमवारी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबा वर्देकर, भाई खोत, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, प्रणिता पाताडे, संदीप कदम, डॉ. मिलिंद कुलकर्णी, मधुसूदन बांदिवडेकर आदी यावेळी उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, कासार्डे येथे पाहुण्यांची सभा होती. पाहुणे आले आणि गेले. मात्र, आम्ही येथेच राहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला गोव्याहून माणसे आणण्यात आली होती. गोव्यात मद्य स्वस्त आहे. त्यामुळे तेथे अनेक माणसे धुंदीत असतात. तशाप्रकारचा विकास आम्हाला नको आहे. नरेंद्र मोदी यांनी येथील विकासाबाबत आधी माहिती घ्यावी आणि त्यानंतरच टीका करावी. ‘अच्छे दिन’ कधी येणार हे त्यांनी सांगावे. पालघर येथील प्रचारसभेत अच्छे दिन येण्यासाठी २०२२ पर्यंतचा वेळ आम्हाला द्या असे मोदींनी सांगितले. मात्र तेवढा वेळ आम्ही देणार नाही. नरेंद्र मोदी हे बनवाबनवी करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसला येथील जनतेचा पाठिंबा असून विधानसभा निवडणुकीत निश्चितच नीतेश राणे विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नीतेश राणे म्हणाले, कणकवली तालुक्याशी माझे कौटुंबिक तसेच भावनिक नाते जुळलेले आहे. कुटुंबप्रमुख आपल्या घरातील सर्व व्यक्ती कशा सुखी होतील हे पहात असतो. त्याप्रमाणेच या तालुक्यातील लोकांबद्दल मला प्रेम आहे. येथील जनतेचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळत आहे हे माझे मी भाग्य समजतो. यापुढे माझ्यावर पडणाऱ्या जबाबदारीची मला जाणीव असून तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. २००९ पासून कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विकास थांबला आहे. शिवसेना, भाजपचे नेते काय बोलतात हे त्यांचेच त्यांना समजत नाही. त्यांना जनतेबाबत कोणतीही आस्था नाही. येत्या पाच वर्षात येथील विकास केला नाही तर २०१९ मध्ये पुन्हा तुमच्यासमोर मतांसाठी येणार नाही. या निवडणुकीत मला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. भालचंद्र मुणगेकर, बाबा वर्देकर आदींनीही मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)