शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शेतकºयांच्या कर्जमाफीमुळे ‘सहवीज’चे पैसे अडवू नयेत ! : रोहित पवार

By appasaheb.dilip.patil | Updated: July 27, 2017 14:56 IST

सोलापूर दि २७ : शेतकºयांना कर्जमाफी दिल्याच्या कारणामुळे सरकारने सारख कारखान्यांचे सहवीज निर्मितीचे पैसे अडवू नये. असे आवाहन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांनी यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसाखर कारखानदारीला आवश्यक उद्योगाचा दर्जा द्यावाराज्यात सध्या ७७ खासगी आणि ८५ सहकारी साखर कारखाने सुरूपाचशे मीटरच्या आदेशामुळे मोलायसिस आणि अल्कोहलची मागणी कमी झाली‘जीएसटी’चा साखरेच्या दरावरील परिणाम झाला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : शेतकºयांना कर्जमाफी दिल्याच्या कारणामुळे सरकारने सारख कारखान्यांचे सहवीज निर्मितीचे पैसे अडवू नये. साखर कारखानदारीला आवश्यक उद्योगाचा दर्जा द्यावा. जास्त पाणी लागणारा उद्योग म्हणून त्याकडे नकारात्मक नजरेने न पाहाता त्याला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांनी यांनी आज येथे केले.पवार हे बारामती अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजचेही अध्यक्ष असून, राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नातू आहेत. सोलापूर दौºयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना पवार यांनी सरकारकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. ते म्हणाले की, साखर कारखान्यांचा देशाच्या सामाजिक - आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव आहे. शेतकºयांना मोठे उत्पन्न देणारा हा उद्योग आहे; पण सध्याचे सरकार याकडे जास्त पाणी लागणारा उद्योग म्हणून पाहात आहे खरं तर स्टिल उद्योगापेक्षा याला कमी पाणी लागते. सरकारने आता ऊस उत्पादकांवर  ठिबक सिंचन बंधन घातले आहे; पण या बंधनकारकतेची गंभीरतेने अंमलबजावणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.राज्यात सध्या ७७ खासगी आणि ८५ सहकारी साखर कारखाने सुरू आहेत. खासगी कारखान्यांमुळे सहकारी कारखाने मोडीत निघत नसल्याचे स्पष्ट करून ऊस उत्पादकांचे अनुदान कमी करणे तसेच ऊसाचे दर आणि सहवीजनिर्मितीवरील नियंत्रण चुकीचे असल्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले की,सरकार साखर कारखान्यांवर एवढे नियंत्रण का घालत आहे, हे कळत नाही. कारखान्या सध्या अडचणीत आहेत. त्यांना मिळणारे सहवीजनिर्मितीचे पैसेही तोकडे आहेत. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या मद्य दुकानांसंदर्भातील पाचशे मीटरच्या आदेशामुळे मोलायसिस आणि अल्कोहलची मागणी कमी झाली. इथेनॉलचा दरही कमीच आहे. तो वाढविला तर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.साखर कारखान्यांचा प्रति टन ऊस गाळप आणि साखर निर्मितीचा खर्च वाढला आहे. पाऊस व्यवस्थित झाला तरच कारखाने व्यवस्थित चालतील आणि सहवीज निर्मिती चांगली होईल; पण सध्यातरी कारखान्यांना होणारे नुकसान हे कर्जातच रूपांतरीत होत आहे, असे त्यांनी सांगितले.-----------------सरकारची नीती...रोहित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर थेट आरोप करण्याचे टाळले; पण ते म्हणाले की,सरकार चालविताना  दोन नीती वापरल्या जातात, एक असते सर्वांना बरोबर घेऊन जाणे आणि दुसरी म्हणजे अडचणीत आणणे. सरकार दुसरी नीती वापरत आहे की काय. असे वाटते. शेतकरी आणि शेतकºयांच्या संघटना कमकुवत करण्याचे प्रयत्न चुकीचे आहेत, असे ते म्हणाले.-----------------‘जीएसटी’चा परिणामवस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’चा साखरेच्या दरावरील परिणाम झाला; पण तो साठा संपविल्यामुळे. हा नवीन कर येण्यापूर्वी साखरेचा साठा होता; पण कराचा अंदाज नसल्यामुळे तो रिकामा करण्यात आला; पण प्रत्यक्षात कराची अंमलबजाणी झाल्यानंतर मात्र दर वाढले. सध्या सरकारकडे साखरेचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे ती आयात केली जाणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.