शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग नको

By admin | Updated: May 9, 2016 00:59 IST

लोकसभेच्या निवडणुकांना अजून ३ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, नरेंद्र मोदी यांचे सरकार पडत नाही.

पुणे : लोकसभेच्या निवडणुकांना अजून ३ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, नरेंद्र मोदी यांचे सरकार पडत नाही. त्यापूर्वीच पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? अशा चर्चा करून गुडघ्याला बाशिंग बांधू नये, असा टोला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी एका मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर लगावला. या वेळी त्यांनी त्यांच्या पटट्ेवाला ते गृहमंत्रिपदापर्यंतचा प्रवास उलगडला. डीएसके फाउंंडेशनच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांच्यासमवेत गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी उद्योगपती डी. एस. कुलकर्णी उपस्थित होते. गाडगीळ यांनी शिंदे यांना राजकारण, वैयक्तिक आयुष्य, साहित्य, कला, समाजकारण अशा विविध विषयांवर बोलते केले. तब्बल दीड तास हा गप्पांचा कार्यक्रम रंगला.पंतप्रधानपदाचे नितीशकुमार हे प्रबळ दावेदार ठरू शकतील, असे विधान नुकतेच शरद पवार यांनी केले असल्याचा संदर्भ देऊन गाडगीळ यांनी शिंदे यांना पंतप्रधानपदाचे कोण चांगले उमेदवार ठरू शकतील, अशी विचारणा केली. त्या वेळी शिंदे म्हणाले, ‘‘नितीशकुमारांबाबत पवार यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, मोदी सरकार पडत नाही तोपर्यंत गुडघ्याला बाशिंग बांधू नये.’’अफजल गुरू याला फाशी देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत काँग्रेसचेच माजी केंद्रीय मंत्री पी. चिंदमबरम यांनी व्यक्त केले असल्याबाबत विचारणा केली असता सुशीलकुमार म्हणाले, ‘‘चिदंबरम यांनी असे मत व्यक्त केले की नाही ते माहीत नाही. मात्र, चिदंबरम प्रख्यात वकील होते. गुरू याला फाशी देण्याच्या निर्णयाचा रिव्हयू करायला कोणी अडविले नव्हते. राष्ट्रपतींनी एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजाावणी करणे भाग असते. ’’शरद पवार यांनी राजकारणात आणले, तर वसंतराव नाईक यांनी मंत्रिपदाची संधी दिली. आजचा चपराशी उद्याचा मंत्री होतो, हा लोकशाहीचा विजय आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)