शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची शिफारस नको!

By admin | Updated: July 20, 2016 03:43 IST

पोलीस ठाण्यात पासपोर्ट पडताळणीसाठी नगरसेवकाच्या शिफारस पत्राची असलेली जाचक अट लोकमतच्या बातमीनंतर मागे घेण्यात आली.

शशी करपे,

वसई- वसई विरार परिसरात असलेल्या सात पोलीस ठाण्यात पासपोर्ट पडताळणीसाठी नगरसेवकाच्या शिफारस पत्राची असलेली जाचक अट लोकमतच्या बातमीनंतर मागे घेण्यात आली. पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी याप्रकरणी सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत पत्र पाठवून कानउघडणी केली आहे. त्यामुळे वसईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.वसई तालुक्यात विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपूर आणि वसई अशी सात पोलीस ठाणी आहेत. याठिकाणी दररोज किमान शंभरहून अधिक पासपोर्ट अर्ज पडताळणीसाठी येत असतात. पोलीस ठाण्यात अर्जदारांकडून स्थानिक नगरसेवक अथवा पोलीस पाटलांचे शिफारस पत्र मागितले जाते. त्याशिवाय पडताळणी केली जात नसे. दुसरीकडे, नगरसेवक अथवा पोलीस पाटील यांच्याकडे सहजपणे शिफारस पत्र मिळत नसल्याने अर्जदारांची गैरसोय होत होती. याप्रकरणी लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच आमदार आनंद ठाकूर यांनी याबाबत पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. >फक्त वसई, विरारमध्येच होता अजब नियमवसई विरार वगळता इतर ठिकाणी पासपोर्ट पडताळणीसाठी नगरसेवकांचे शिफारस पत्र मागितले जात नाही. तसेच पडताळणीसाठी नगरसेवकांच्या शिफारसपत्राची आवश्यकता असल्याचे कोणत्याही सरकारी परिपत्रकात बंधन घालण्यात आलेले नाही. असे असतानाही वसई विरार परिसरात हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुुरु होता. आता पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी सर्व पोलीस ठाण्यांना लेखी समज देऊन या जाचक अटीतून मुक्तता केली आहे.त्याचबरोबर पोलीस पाटील यांचेही शिफारसपत्र मागू नये असेही आदेश राऊत यांनी दिले आहेत. वसई विरार परिसरात दररोज किमान शंभरहून अधिक अर्ज पोलीस ठाण्यात तपासणीसाठी येत असतात. त्यामुळे या सर्वांची जाचक अटीतून मुक्तता झाली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात पडताळणी करण्यासाठी गेलेल्या अर्जदारांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली असून ही प्रथा बंद झाली पाहिजे, असे आमदार आनंद ठाकूर यांनी लोकमतला सांगितले.