शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

आर्थिक विषमतेकडे दुर्लक्ष नको

By admin | Updated: May 16, 2016 00:47 IST

विविध संशोधन क्रांतीतून मानवाच्या पलीकडे विश्व निर्माण होण्याची आगामी काळात शक्यता आहे

बारामती : विविध संशोधन क्रांतीतून मानवाच्या पलीकडे विश्व निर्माण होण्याची आगामी काळात शक्यता आहे. जैविक क्रांतीसह निर्माण झालेल्या अनेक बदलातून संपूर्ण जग नाहीसे होण्याचीदेखील शक्यता आहे. जगात वाढणारी आर्थिक, सामाजिक विषमता दुर्लक्षित करून चालणार नाही, असे मत विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केली. शारदानगर येथे अप्पासाहेब पवार सभागृहात सुधीर गाडगीळ यांनी वासलेकर यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रेक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले, आगामी २५ वर्षांत जगात दहशतवाद हे मोठे आव्हान ठरणार आहे. याबाबत जगभरातील तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केले आहेत. पाण्यामुळे पुढील काळात आंतरराष्ट्रीय युद्धजन्य स्थिती येऊ शकते. सर्वत्र आमूलाग्र बदल होत आहेत. चौथी औद्योगिक क्रांती येऊ पाहत आहे. पृथ्वीच्या इतिहासात अब्जावधी वर्षांमध्ये प्रथमच जिवाची निर्मिती प्रयोग शाळेत करण्यात काही वर्षांपूर्वी यश आले. ते म्हणाले, ‘‘सध्या सर्वत्र मानवानंतरचे विश्व या विषयावर चर्चा होत आहे. मानवाच्या पलीकडे विश्व निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे चांगले-वाईट परिणाम होण्याचे संकेत आहेत. अन्न, पाण्याचा तुटवडा, कर्करोगावरील उपचार यातून पुढे येऊ शकतो. दुसऱ्या बाजूला एकदा क्रूरकर्मा संपूर्ण जग नाहीसे करण्याची शक्यता आहे. जगातील युनो कौन्सिलच्या सुरक्षा मंडळात पाणी या विषयावर आधारित संशोधन मांडण्यात आले आहे. त्याला प्रगतिशील देशांकडून पाठिंबा मिळत आहे. तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन चाकांवर जगाचे भवितव्य आहे. संशोधनावर आधारित समाजनिर्मितीसाठी वैचारिक बैठकीची आवश्यकता आहे. शैक्षणिक बदल, शैक्षणिक क्रांतीद्वारे हे शक्य होईल. ज्ञान, संशोधन आणि शाश्वत मूल्यावर आधारित भारतीय समाज पुढे जाईल, याचा विचार करण्याची गरज वासलेकर यांनी शेवटी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बारामतीचा नियोजनबद्ध विकास कौतुकास्पदबारामती शहराचा नियोजनबद्ध विकास हा कौतुकास्पद आहे. येथील कृषी क्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करणारे आहेत. शरद पवार यांनी बारामतीचा केलेल्या नियोजनबद्ध विकासाचे परिणाम आज पहावयास मिळत असल्याची पावती वासलेकर यांनी दिली.