शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

रेल्वे यंत्रणाच नापास

By admin | Updated: July 14, 2014 03:42 IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला.

सुशांत मोरे, मुंबईदिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. या अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना सादर केला आहे. या अहवालात रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास आणि अयशस्वी झाल्याचे नमूद केले आहे. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अपघातात २२ प्रवासी ठार तर शेकडो प्रवासी जखमी झाले. हा अपघात रेल्वे रुळाला तडा गेल्यानेच झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वेने वर्तविला आहे. त्याबाबतचा रेल्वेच्या आरडीएसओकडून अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडून अपघाताची चौकशी केली जात होती. अपघात नेमका कसा झाला, त्याचे मूळ कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आहे; तर अपघातग्रस्त ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हे कोकण रेल्वेकडून केले जात होते. त्यामुळे या बाजूदेखील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पडताळून पाहिल्या जात होत्या. मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून एक आठवड्यापूर्वीच या अपघाताचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाचे महाव्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात त्यांनी रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास झाल्याचे नमूद केले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले की, मुळात यंत्रणाच सक्षम नसल्यामुळे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बोगीबरोबरच रेल्वे रुळाची देखभाल आणि दुरुस्तीही बरोबर झालेली नव्हती.