शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे यंत्रणाच नापास

By admin | Updated: July 14, 2014 03:42 IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला.

सुशांत मोरे, मुंबईदिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. या अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना सादर केला आहे. या अहवालात रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास आणि अयशस्वी झाल्याचे नमूद केले आहे. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अपघातात २२ प्रवासी ठार तर शेकडो प्रवासी जखमी झाले. हा अपघात रेल्वे रुळाला तडा गेल्यानेच झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वेने वर्तविला आहे. त्याबाबतचा रेल्वेच्या आरडीएसओकडून अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडून अपघाताची चौकशी केली जात होती. अपघात नेमका कसा झाला, त्याचे मूळ कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आहे; तर अपघातग्रस्त ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हे कोकण रेल्वेकडून केले जात होते. त्यामुळे या बाजूदेखील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पडताळून पाहिल्या जात होत्या. मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून एक आठवड्यापूर्वीच या अपघाताचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाचे महाव्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात त्यांनी रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास झाल्याचे नमूद केले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले की, मुळात यंत्रणाच सक्षम नसल्यामुळे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बोगीबरोबरच रेल्वे रुळाची देखभाल आणि दुरुस्तीही बरोबर झालेली नव्हती.