शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रेल्वे यंत्रणाच नापास

By admin | Updated: July 14, 2014 03:42 IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला.

सुशांत मोरे, मुंबईदिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. या अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना सादर केला आहे. या अहवालात रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास आणि अयशस्वी झाल्याचे नमूद केले आहे. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अपघातात २२ प्रवासी ठार तर शेकडो प्रवासी जखमी झाले. हा अपघात रेल्वे रुळाला तडा गेल्यानेच झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वेने वर्तविला आहे. त्याबाबतचा रेल्वेच्या आरडीएसओकडून अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडून अपघाताची चौकशी केली जात होती. अपघात नेमका कसा झाला, त्याचे मूळ कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आहे; तर अपघातग्रस्त ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हे कोकण रेल्वेकडून केले जात होते. त्यामुळे या बाजूदेखील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पडताळून पाहिल्या जात होत्या. मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून एक आठवड्यापूर्वीच या अपघाताचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाचे महाव्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात त्यांनी रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास झाल्याचे नमूद केले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले की, मुळात यंत्रणाच सक्षम नसल्यामुळे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बोगीबरोबरच रेल्वे रुळाची देखभाल आणि दुरुस्तीही बरोबर झालेली नव्हती.