शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

पेशाला गालबोट नको!

By admin | Updated: October 9, 2016 00:19 IST

औरंगाबाद येथे शिक्षक आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला ही लाजिरवाणी बाब आहे. कोणत्याही सरकारला अशा प्रकारे शिक्षकांवर लाठ्याकाठ्या चालवायला आवडत नाही.

मुंबई : औरंगाबाद येथे शिक्षक आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला ही लाजिरवाणी बाब आहे. कोणत्याही सरकारला अशा प्रकारे शिक्षकांवर लाठ्याकाठ्या चालवायला आवडत नाही. प्रत्येकाच्या मागण्या असतात. त्यावर चर्चा करता आली असती. मात्र ज्या पद्धतीने शिक्षकांच्या आंदोलनात शिवीगाळ, नारेबाजी आणि दगडफेक झाली, त्याचे समर्थन करता येणार नाही. आजही समाजात शिक्षकाचे स्थान वरचे समजले जाते. शिक्षकांच्या उच्च दर्जाला गालबोट लागेल असे प्रकार घडता कामा नयेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक आंदोलनातील अपप्रकारांवर नाराजी व्यक्त केली. शनिवारी, नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्य शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, राहुल नार्वेकर यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी राज्यातील १०९ शिक्षकांना २०१५-१६ सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, १५ वर्षांपासूनची शिक्षकांची मागणी विनोद तावडे यांनी पूर्ण केली. २० टक्के अनुदान देताना घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याचे कोणाला वाटल्यास त्याचा फेरविचार करता आला असता. मात्र आंदोलनाच्या निमित्ताने जो व्यवहार पाहायला मिळाला त्याचे समर्थन करता येणार नाही. गोंधळ घालणारे शिक्षक असूच शकत नाहीत. काही संस्थाचालकांनी आंदोलनात बाहेरची माणसे घुसविली असण्याची शक्यता बोलून दाखविली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांचे समाजात जे स्थान आहे, त्याला कमीपणा आणता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. सलग १० वर्षे शिक्षणात तेराव्या आणि चौदाव्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राने अवघ्या एका वर्षात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ‘लर्निंग आऊटकम’मध्ये १० टक्क्यांनी सुधारणी झाली. तब्बल १८ हजार शाळा या १०० टक्के लर्निंग आऊटकमवाल्या झाल्या आहेत. न भूतो न भविष्यति असे हे यश शिक्षण विभागाने अवघ्या एका वर्षात मिळविल्याचे सांगून फडणवीस यांनी शिक्षण विभागाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. आगामी काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तत्पूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, यंदा पुरस्कारासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सुरुवातीला काही जणांनी या पद्धतीवर टीका केली. मात्र, ज्यांना स्वत:च्या कर्तृत्वावर पुरस्कार मिळेल असा विश्वास होता त्या सर्वांनी याचे स्वागत केले. आॅनलाइन पद्धतीमुळे शिफारसींच्या आधारे होणारी निवड बंद झाली. त्यामुळे इथे जे १०९ आदर्श शिक्षक बसले आहेत ते सारे प्रयोगशील शिक्षक असल्याची भावना तावडे यांनी व्यक्त केली. जागतिक दर्जाची शिक्षणप्रणाली राज्यात आणण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या वर्षात काही शिक्षक स्वखर्चाने शिक्षणातील जागतिक प्रयोग पाहून येणार आहेत. मात्र ज्यांना असा प्रवास शक्य नाही त्या सर्वांसाठी आदर्श जागतिक शिक्षणाबाबतची चित्रफीत आणि सादरीकरण तयार करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१0९ शिक्षकांना पुरस्कारयंदा १०९ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात प्राथमिक (३८), माध्यमिक (३९), आदिवासी भागातील प्राथमिक (१९), क्रीडा आणि कला (२), स्काऊट व गाईड (२), अपंग (१) शिक्षकांचा समावेश आहे. तर, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने ८ जणांना सन्मानित करण्यात आले. १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.