शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

कर्जमाफीवरून आता बुद्धिभेद करू नका!

By admin | Updated: June 26, 2017 01:57 IST

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आहे, म्हणूनच आम्ही राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आहे, म्हणूनच आम्ही राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. ही कर्जमाफी एकूण ३४ हजार २२ कोटी रुपयांची असेल. शासनाच्या या निर्णयामुुळे ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. आता कुणीही कर्जमाफीच्या विषयावरून बुद्धिभेद न करता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.रविवारी मराठी पत्रकार परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, गौरवमूर्ती मा. गो. वैद्य, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख व परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांना ‘जीवन गौरव’ तर लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांना ‘ग. त्र्यं. माडखोलकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय, ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर, सुनील चावके, कार्तिक लोखंडे, चंद्रकांत सामंत, रश्मी पुराणिक, विनोद जगदाळे, राजन वेलकर व गो. पी. लांडगे यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे जिल्हा पत्रकार संघ व रामटेक तालुका पत्रकार संघाचा सन्मान करण्यात आला. सध्या माझे वय ९४ वर्षे आहे. आपण १०० वर्षे जगावे अशी माझी इच्छा होती. परंतु आता पुढे जगावे वाटत नाही. मृत्यू माझा मित्र आहे. त्याने लवकर यावे, मी त्याचे स्वागत करील, अशी हळवी भावना मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केली. व्हॉट्सअ‍ॅप पत्रकारिता धोकादायक-आजच्या सोेशल मीडियाच्या काळात पत्रकारितेची माध्यमे बदलत आहेत. आता तर व्हॉटस्अ‍ॅप पत्रकारिता जोरात आहे. आलेल्या पोस्टची शहानिशा न करता बेधडक पुढे पाठवली जात आहे. कोण पुढे लवकर पाठवतो ही स्पर्धाही जीवघेणी आहे. परंतु अशा पद्धतीच्या पत्रकारितेमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून ते कसे टाळता येईल याचा विचार व्हायला हवा, याकडेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.