शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

चूक खपवून घेणार नाही

By admin | Updated: May 21, 2016 05:59 IST

ठाणे विधान परिषदेसाठी प्रथमच अटीतटीची लढत होणार असून, राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे आणि शिवसेनेतर्फे रवींद्र फाटक रिंगणात उतरले

ठाणे : ठाणे विधान परिषदेसाठी प्रथमच अटीतटीची लढत होणार असून, राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे आणि शिवसेनेतर्फे रवींद्र फाटक रिंगणात उतरले आहेत. फाटक यांना उमेदवारी देण्यावरून नाराज झालेल्यांची मनधरणी करण्यात पक्षप्रमुखांना काहीसे यश आले असल्याचा दावा पक्षातून केला जात आहे. परंतु, आता कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असल्याचे फर्मानच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले आहे. या निवडणुकीत थोडीही चूक खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी आमदार आणि नगरसेवकांना दिला आहे. त्यामुळे प्रथमच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी येत्या ३ जून रोजी निवडणूक होणार असून, मतमोजणी ६ जूनला होणार आहे. त्यानुसार, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे डावखरे पाचव्यांदा रिंगणात असून, त्यांना प्रथमच शिवसेनेने कडवी झुंज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी फाटक यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, या उमेदवारीसाठी इच्छुक असलेली काही मंडळी मात्र भलतीच नाराज झाली होती. त्यामुळे त्यांची कानउघाडणी करण्यासाठी मंगळवारी ह्यमातोश्रीह्णवर खासदार, आमदार, नगरसेवकांची एक बैठक घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. या बैठकीत नाराजांची चांगलीच कानउघाडणी केल्याचेही सूत्रांनी सांगितले. नाराजी विसरून एकदिलाने या निवडणुकीसाठी सामोरे जाण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असल्याने छोटी चूकही माफ करणार नसल्याचा इशारा त्यांनी सर्व नगरसेवक आणि आमदारांना दिला आहे. ह्यमातोश्रीह्णनेच आता फर्मान काढल्याने नाराजदेखील प्रचारात उतरले आहेत. भाजपाच्या श्रेष्ठींनीदेखील त्यांच्या नगरसेवकांना एकदिलाने काम करण्याचा सल्ला दिला आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील स्वत: प्रचारात उडी घेणार असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे दिसत आहे.

>अपक्षांचे भाव वधारले सध्याचे संख्याबळ पाहता राष्ट्रवादीकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडे ११९ असे ४२१ मतांचे बळ डावखरेंकडे आहे. तर, शिवसेना ३११, भाजपा १८० अशी ४९१ मते युतीने जुळवून आणली आहेत. उरलेल्या मतांमध्ये रिपाइंचे ८, अपक्ष ४८, मनसे २०, बसपा ५, सपा १७, एमएमआय १, कोणार्क विकास आघाडी ७, सेक्युलर अलायन्स आॅफ इंडिया ४ आणि डाव्यांची ५ मते आहेत. ही संख्या ११९च्या घरात जात असून, हीच मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांचा भाव वधारला आहे. मते फोडाफोडीला ऊत येऊ लागल्याने इतर पक्षांचेही भाव वधारण्याची चिन्हे आहेत.

प्रचाराला सुरुवात : राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांची उमेदवारी सहा महिन्यांपूर्वीच निश्चित झाल्याने त्यांनी प्रचारात सध्यातरी आघाडी घेतली आहे. परंतु, आता फाटक यांच्या प्रचारासाठी आमदार आणि खासदारदेखील सरसावले असून, प्रत्येक ठिकाणच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांना श्रेष्ठींनी जबाबदारी वाटून दिली आहे.

> डावखरे-फाटक यांच्यातच लढत

विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या एका जागेसाठी आलेल्या तीन उमेदवारी अर्जांपैकी राजेश मोरे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेवार रवींद्र फाटक व राष्टÑवादी-काँग्रेसचे वसंत डावखरे यांच्यातील लढतीचा मार्ग मोकळा झाला. तर, दुसरीकडे निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासह संभाव्य घोडेबाजार रोखण्यासाठी निवडणूक विभागासह पालघर, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी जिल्ह्यात १६ दिवसांपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुव्यवस्था जोपासण्यासाठी घोडेबाजारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्षेत्रात रहदारीस अडथळा होईल किंवा उजेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल, अशा रीतीने कोणत्याही सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक जागेवर बॅनर्स लावणे, फलक लावणे, खांबावर झेंडे लावण्यास निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केला आहे. या मनाई आदेशाचा भंग करणाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.