शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

दिवसाआड नको, दररोज पाणी द्या..!

By admin | Updated: August 6, 2016 00:29 IST

शहरात धो-धो पाऊस सुरू असताना पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा विषय मात्र पेटतच चालला आहे.

पुणे : शहरात धो-धो पाऊस सुरू असताना पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा विषय मात्र पेटतच चालला आहे. ‘दिवसाआड पाणी देणे रद्द करून पुण्याला रोज पाणी द्यावे’ या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात महापौर प्रशांत जगताप यांच्यासह भारतीय जनता पक्ष वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. तरीही गेले वर्षभर सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय झालाच नाही. त्यामुळे महापौरांनी शनिवारी (दि. ६) सकाळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले.पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे रवींद्र धंगेकर, बाळासाहेब शेडगे, काँग्रेसचे सुधीर जानजोत, सुनंदा गडाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र पठारे, बॉबी टिंगरे व अन्य अनेक नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. भाजपा व शिवसेनेचे सदस्य या वेळी अनुपस्थित होते. महापौरांनी नंतर सेना सदस्यांचाही रोज पाणी देण्याला पाठिंबा आहे, असे सांगितले.शहरात, धरणक्षेत्रात धोधो पाऊस कोसळत आहे. धरणातील पाणी नदीत सोडले जात आहे. तरीही, पुण्यात गेले वर्षभर सुरू असलेली पाणीकपात रद्द केली जात नाही. पालकमंत्री विविध कारणे सांगत आहेत. कालवा समितीचा यात काहीही संबंध नसताना समितीच्या बैठकीतच निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात पाणीकपात रद्द करावी व पुणे शहराला रोज पाणी द्यावे, अशी मागणी महापौरांच्या नेतृत्वाखाली सर्व नगसेवकांनी केली. पाणीकपात रद्द झाल्याशिवाय दालनातून उठणार नाही, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी राव यांनी धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याचे व पुण्याला रोज पाणी दिले तरी चालण्यासारखे आहे, असे मान्य केले. मात्र, याबाबत सर्व संबंधितांशी बोलावे लागेल, अशी भूमिका घेतली.>महापौरांनी केली टीकापुण्याच्या हक्काच्या पाण्याची पालकमंत्री राजकारणातून अडवणूक करीत आहेत, असा आरोप महापौरांनी नंतर केला. फक्त बापट यांच्या अट्टहासामुळे पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात येत आहे, अशी टीका महापौर जगताप यांनी केली. मागील वर्षी ६ सप्टेंबरला पाणीकपात सुरू झाली. तो मुहूर्त साधून बहुधा त्यांना कपात रद्द करण्याचा निर्णय घ्यायचा असावा, अशी उपरोधिक टीका महापौरांनी या वेळी केली.>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हेमंत संभूस यांनी पालकमंत्री बापट यांच्यावर टीका करणारे निवेदन जाहीर केले, तर अजय शिंदे यांनी बापट यांच्या संपर्क कार्यालयासमोर थेट उपोषणच सुरू केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व आंदोलन थांबविले.