शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

संविधानाला हात लावू देणार नाही!

By admin | Updated: April 4, 2016 03:15 IST

भारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे

कमलेश वानखेडे,  नागपूरभारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसने ‘एक शपथ... संविधानाला हात लावू देणार नाही!’ अशी आक्रमक ‘थीम’ तयार केली असून ११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर आयोजित सभेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, असाच असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.सत्तास्थापनेनंतर भाजपा नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तवे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करण्याबाबत केलेले वक्तव्य याचे पडसाद बिहारच्या निवडणूक निकालात उमटले आणि भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आरक्षण लागू राहील, असे स्पष्ट केले. पण हा वाद शांत होत नाही तोच रोहित वेमुला प्रकरण समोर आले. यावरून देशभरातील दलित संघटना आक्रमक झाल्या. आरक्षण, राज्यघटना या मुद्यांवर भाजपा, संघ परिवार ‘बॅकफूट’वर गेला असल्याचा अंदाज काँग्रेसने बांधला आहे. ही संधी साधत दुरावलेल्या दलित समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतर काँग्रेसने १९९९-२००० साली देशभर संविधान बचाव रॅली काढल्या. या रॅलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कमबॅक’ केले होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा एकदा तशीच तयारी चालविली आहे.