शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाला हात लावू देणार नाही!

By admin | Updated: April 4, 2016 03:15 IST

भारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे

कमलेश वानखेडे,  नागपूरभारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसने ‘एक शपथ... संविधानाला हात लावू देणार नाही!’ अशी आक्रमक ‘थीम’ तयार केली असून ११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर आयोजित सभेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, असाच असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.सत्तास्थापनेनंतर भाजपा नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तवे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करण्याबाबत केलेले वक्तव्य याचे पडसाद बिहारच्या निवडणूक निकालात उमटले आणि भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आरक्षण लागू राहील, असे स्पष्ट केले. पण हा वाद शांत होत नाही तोच रोहित वेमुला प्रकरण समोर आले. यावरून देशभरातील दलित संघटना आक्रमक झाल्या. आरक्षण, राज्यघटना या मुद्यांवर भाजपा, संघ परिवार ‘बॅकफूट’वर गेला असल्याचा अंदाज काँग्रेसने बांधला आहे. ही संधी साधत दुरावलेल्या दलित समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतर काँग्रेसने १९९९-२००० साली देशभर संविधान बचाव रॅली काढल्या. या रॅलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कमबॅक’ केले होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा एकदा तशीच तयारी चालविली आहे.