शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

मुलांच्या हातात झाडू देणार नाही

By admin | Updated: May 9, 2016 02:00 IST

कल्याण-डोंबिवली शहरांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सहभाग घेतला पाहिजे. मुले जसे आईवडिलांचे ऐकतात, त्याचप्रमाणे आता मुलांचेही पालक ऐकू लागले आहेत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सहभाग घेतला पाहिजे. मुले जसे आईवडिलांचे ऐकतात, त्याचप्रमाणे आता मुलांचेही पालक ऐकू लागले आहेत. शहर स्वच्छतेसाठी ही भावी पिढी पालकांना समजवेल. याचा अर्थ मुलांच्या हाती झाडू दिला जाणार नाही. घाण करणाऱ्यांना ही मुले टोचण्याचे काम करतील, जेणेकरून अशा मंडळींवर अंकुश ठेवला जाईल. म्हणूनच, अभियानाच्या उद्घाटनासाठी मुलांना आणण्याचा आग्रह धरला, असे स्पष्टीकरण शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिले. ‘परिवर्तन’ या संकल्पनेंतर्गत स्वच्छता अभियानाचे उद््घाटन डोंबिवली जिमखाना येथील पटांगणात ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली झाले. या वेळी रश्मी ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपनेते डॉ. अमोल कोल्हे, सचिव आदेश बांदेकर, कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र उपस्थित होते. ठाकरे यांनी सुरतचे उदाहरण दिले. सुरतला जेव्हा प्लेगची साथ आली होती, त्या वेळी तत्कालीन आयुक्तांनी सर्व शक्ती पणाला लावत सुरत स्वच्छ तसेच प्लेगमुक्तही केले. आज जवळपास १० वर्षांनी सुरत हे स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल आहे. कल्याण-डोंबिवलीतील नागरिक सूज्ञ आहेत. तेदेखील शहर स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करतील आणि महापालिकेला, शिवसेनेला सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहर स्वच्छतेसाठी जे आवश्यक आहे, त्या सर्वांची सोय करण्याचे आदेश महापौरांना दिले.