शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

केवळ मंत्रालय नको तर ओबीसींसाठी निधीही द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 03:03 IST

ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नुसती घोषणा करून चालणार नाही

अनगाव : ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नुसती घोषणा करून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात कृतीत आणून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी केंद्र व राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कुणबी समाजातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. न्याय मिळण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. पालखने कुणबी प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम महाराज क्रीडानगरीत कुणबी आध्यात्मिक संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतमालाला बाजारभाव नाही. भातखरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करतोय, असे ते म्हणाले. विकासाच्या नावाखाली रस्त्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे जबरदस्तीने भूसंपादन सुरू आहे. त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा. जोवर मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी महिनाभर मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरावा, असे ठाकरे यांनी सांगितले. येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार किसन कथोरे, गोटीराम पवार, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, रवींद्र घोडविंदे, विद्या वेखंडे, सुरेश टावरे, योगिता धानके, शोएब गुड्डू, शंकर खाडे, अरु ण पानसरे, किसन तारमळे, शरद पाटील, ज्ञानेश महाराज उपस्थित होते. उदय पाटील, काशिनाथ तिवरे, महेश धानके, विकास जाधव, युवराज पाटील, प्रकाश भोईर, विष्णू चंदे, भगवान सांबरे, अजय पाटील, युवराज पाटील, मनोहर ठाकरे, राजूभाऊ चौधरी, तुकाराम पष्टे आदी पदाधिकाऱ्यांचे समाजबांधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (वार्ताहर)>संमेलनातून दिशा मिळावीअनगाव : कुणबी समाजाला इतिहास समजावा, यासाठी संमेलने होणे गरजेचे आहे. ती समाजाला ज्ञानाची, विचारांची दिशा देणारी असावी. ही संमेलने दिशादर्शक हवी, अन्यथा केवळ जेवणावळीपुरतीच ती उरतील, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जेमिनी कडू यांनी व्यकत केले.