शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

पेरणीची घाई करू नका

By admin | Updated: June 22, 2016 04:10 IST

राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी खरिपाची पेरणी करण्याइतपत पाऊस झाला नसल्याने तूर्त पेरणीची घाई करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी खरिपाची पेरणी करण्याइतपत पाऊस झाला नसल्याने तूर्त पेरणीची घाई करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विशेषत: विदर्भ आणि नाशिक विभागातील काही भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. १ ते २१ जून पर्यंत राज्यात ६५.२ मिलिमीटर इतका पाऊस पडला. गेल्यावर्षी याच काळात ९३.१ टक्के इतका पाऊस झाला होता. २६ जूनपासून दमदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्याच्या जलाशयांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी १७ टक्के पाणीसाठा होता. सध्या मराठवाड्यात एक टक्का, कोकण २८ टक्के, नागपूर विभाग १६ टक्के, अमरावती विभाग १० टक्के, नाशिक ८ टक्के तर पुणे विभागात ७ टक्के जलसाठा आहे. राज्यात आजमितीस ४ हजार ९८२ गावे आणि ७ हजार ८६२ वाड्यांना ६ हजार १३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांवर ६ लाख ९० हजार मजूर कामे करीत आहेत. चाराछावण्यांच्या संख्येत घट होत आहे. बीड जिल्ह्यात एक, उस्मानाबादमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३५, लातूरमध्ये ४, सांगलीत एक तर परभणीत एक अशा एकूण ४६ छावण्या सुरू आहेत. ही संख्या ४०० पर्यंत गेली होती. (विशेष प्रतिनिधी)