शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

पेरणीची घाई करू नका

By admin | Updated: June 22, 2016 04:10 IST

राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी खरिपाची पेरणी करण्याइतपत पाऊस झाला नसल्याने तूर्त पेरणीची घाई करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी खरिपाची पेरणी करण्याइतपत पाऊस झाला नसल्याने तूर्त पेरणीची घाई करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विशेषत: विदर्भ आणि नाशिक विभागातील काही भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. १ ते २१ जून पर्यंत राज्यात ६५.२ मिलिमीटर इतका पाऊस पडला. गेल्यावर्षी याच काळात ९३.१ टक्के इतका पाऊस झाला होता. २६ जूनपासून दमदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्याच्या जलाशयांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी १७ टक्के पाणीसाठा होता. सध्या मराठवाड्यात एक टक्का, कोकण २८ टक्के, नागपूर विभाग १६ टक्के, अमरावती विभाग १० टक्के, नाशिक ८ टक्के तर पुणे विभागात ७ टक्के जलसाठा आहे. राज्यात आजमितीस ४ हजार ९८२ गावे आणि ७ हजार ८६२ वाड्यांना ६ हजार १३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांवर ६ लाख ९० हजार मजूर कामे करीत आहेत. चाराछावण्यांच्या संख्येत घट होत आहे. बीड जिल्ह्यात एक, उस्मानाबादमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३५, लातूरमध्ये ४, सांगलीत एक तर परभणीत एक अशा एकूण ४६ छावण्या सुरू आहेत. ही संख्या ४०० पर्यंत गेली होती. (विशेष प्रतिनिधी)