शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवांसाठी पाणी देऊ नका!

By admin | Updated: January 19, 2016 03:48 IST

महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती असल्याने नाशिक जिल्ह्याच्या गंगापूर धरणातील पाणी कोणत्याही धार्मिक सणासाठी न सोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिला.

मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती असल्याने नाशिक जिल्ह्याच्या गंगापूर धरणातील पाणी कोणत्याही धार्मिक सणासाठी न सोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिला. त्याचबरोबर ‘मांगी-तुंगी’ या जैनांच्या तीर्थक्षेत्री फेब्रुवारीमध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठीही गंगापूर धरणातून पाणी न सोडण्याचा आदेश देण्यात आला.महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती असतानाही राज्य सरकारने कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी पाणी सोडले. याविरोधात पुण्याचे प्राध्यापक एच.एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी.व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर होती.नाशिकमध्ये ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ‘मांगी-तुंगी’ या जैनांच्या तीर्थक्षेत्री मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीही राज्य सरकार गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे, अशी भीती देसरडा यांनी सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठापुढे व्यक्त केली. उच्च न्यायालयाने कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी पाणी न सोडण्याचा आदेश सप्टेंबरमध्ये राज्य सरकारला दिला होता. राज्यात दुष्काळ असताना शाहीस्नानासाठी पाणी सोडल्यामुळे खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले होते. गंगापूर धरणातून पाणी सोडायचे असल्यास सरकारने न्यायालयाची पूर्व-परवानगी घ्यावी, असाही आदेश खंडपीठाने दिला होता. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी २९ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)