शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

काय बी द्या... ‘कुरिअर’नं येतंयच!

By admin | Updated: August 26, 2015 21:39 IST

शस्त्रसाठा प्रकरणानं घातलं डोळ्यात अंजन--पार्सलमध्ये काय दडलंंय ? -एक

जगदीश कोष्टी -सातारा  एखाद्या वस्तूंसाठी कोसो दूर वेळ अन् पैसा खर्च करून जाणं शक्य नसतं, त्यातून कुरिअरसारख्या पर्यायाचा जन्म झाला. पण याच पर्यायाचा गैरवापर केल्यामुळे काय धोका संभावतो, याचा प्रत्यय चार दिवसांपूर्वी भुर्इंजमध्ये आला. पिस्तूल, तलवारी, जंब्यासारखा शस्त्रसाठा चक्क पंजाबमधून तोही कुरिअरने आल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरुन कोणाचाच कोणाला मेळ नसल्याचे आणि काहीही द्या सुरक्षित पोहोचत असल्याचेच समोर आले आहे.सातारा जिल्हा शांत म्हणून एकेकाळी ओळखला जात होता. एकेकाळी अशाचसाठी की कऱ्हाडमध्ये गँगवारचे प्रस्थ वाढत चालले आहे. अनेकजण ‘घोडा’ कमरेला अडकवूनच फिरत आहेत. त्यात कमी म्हणून की काय, भुर्इंजचे प्रकरण उद्भवले. एका रात्रीत मोठा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखा आणि भुर्इंज पोलिसांनी हस्तगत केला. हा शस्त्रसाठा चक्क कुरिअरने आला असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सुमारे २१ विविध कंपन्यांमार्फत कुरिअरसेवा दिली जाते. या कंपन्या कशाप्रकारे सेवा देतात, याची माहिती घेतली असता यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोणत्याही कंपनीकडे स्कॅनिंग यंत्रणा नाही. वस्तू स्वीकारण्यापूर्वी एजंट काही काळजी जरुर घेतात. यामध्ये मौल्यवान वस्तू, पैसे, ज्वालाग्राही पदार्थ तर खोक्यातून पाठविले जात नाहीत ना, याची ग्राहकाकडे चौकशी करतात. खाद्य पदार्थ, कपडे, डायरी यासारख्या घरगुती वस्तू असतील तर पाठविणाऱ्यांकडून तसं लेखी घेतलं जातं. तर कंपन्या, कार्यालयांच्या पार्सलसंदर्भात वस्तूंचे चलन जोडले जाते. आपणाकडे बहुतांश प्रमाणात जमिनीवरुन वाहतूक केली जाते. त्यामुळे या प्रवासादरम्यान रेल्वे, ट्रक वाहतूक किंवापार्सल कंपन्यांच्या वाहनांतून वाहतूक केली जाते. त्यामुळे या मार्गात कोठेही धातूशोधक यंत्राद्वारे तपासणी केली जात नाही. त्यामुळेच बहुधा शस्त्रांची वाहतूक करणे सोपे गेले असावे. ज्या वस्तू हवाई मार्गाने वाहतूक होणार आहेत, त्याच वस्तू विमानतळावर स्कॅनिंग केल्या जातात. क्राईम जगताचं नवं रूपविनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असते. अशांना अटक केल्याचेही उघड झाले आहे. पण यावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी नामी शक्कल लढविल्याचे भुर्इंजच्या घटनेतून उघड झाले आहे. यामध्ये कोणत्याही खोट्या पावत्या दिल्या की कुरिअर कंपन्या पार्सलची वाहतूक करतात आणि हव्या त्या व्यक्तीच्या घरी पोहोच होतात. तर पोलिसांना कळवावेसातारा शहरातही ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून माल येतो. यात मोठी खोकी असतात. प्रत्येक व्यापारी किंवा ट्रान्स्पोर्ट कंपन्यांकडे गुन्हेगारांच्या नजरेतून न पाहता अशा ट्रान्स्पोर्टची यादी करणं, वाहतूक करणाऱ्या खासगी कंपन्यांची बैठक घेऊन समन्वय ठेवणे महत्त्वाचे आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.