शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिघ्यातील अवैध बांधकामे पाडू नका

By admin | Updated: December 23, 2015 01:58 IST

ठाणे शहरानजिक असलेल्या दिघा गावाच्या परिसरात २५ ते ३० वर्षापूर्वी शासनाच्या गुरुचरण जागेवर कोळी व आदिवासी कामगारांनी घरे उभारली आहेत.

नागपूर : ठाणे शहरानजिक असलेल्या दिघा गावाच्या परिसरात २५ ते ३० वर्षापूर्वी शासनाच्या गुरुचरण जागेवर कोळी व आदिवासी कामगारांनी घरे उभारली आहेत. परंतु महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या लोकांना नोटिसा बजावून त्यांना जागा खाली करण्याचे आदेश दिले आहे. ही कारवाई तात्काळ थांबविण्याचे निर्देश विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांनी मंगळवारी दिले.सदस्य विद्या चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. २५ ते ३० वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या अनुमतीनंतर सदर लोकांनी एकत्र येऊ न गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्यांनी ९६ इमारती उभारल्या आहेत. ग्रामपंचातीकडे घरांच्या रीतसर नोंदी असून यावर पाणीपट्टी व घरपट्टी आकारली जाते. असे असतानाही २०१२ मध्ये ही जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्यात आली.दरम्यान हेतुपूरस्पर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही बांधकामे अनधिकृत असल्याचे दर्शविण्यात आले. यावर न्यायालयाने बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे २५ ते ३० हजार कुटुंब उघड्यावर येतील असे निदर्शनास आणले. हेमंत टकले, जयंत पाटील व नरेंद्र पाटील आदींनी ही कारवाई तात्काळ थांबविण्याची मागणी केली. राज्यातील अनधिकृत बांधकामांना आळा व निर्बंध घालण्यासाठी व अनधिकृत बांधकामे काही प्रमाणात नियमानुकूल करण्याचे धोरण ठरविण्यासाठी शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. दिघा येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाची अनुमती मिळाल्याशिवाय करू नये, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद असल्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले. दिघा येथील बांधकाम गुरुचरण जागेवर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास का आणले नाही. ते आणणार का, असा प्रश्न सुनील तटकरे यांनी केला. ३० डिसेंबर २०१५ पर्यंत निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)