शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

ना कर, ना कर्जमाफी !

By admin | Updated: March 19, 2017 05:50 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आणि जनतेवर नवे कर नाही, असा शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाची ‘हमी’ देणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आणि जनतेवर नवे कर नाही, असा शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाची ‘हमी’ देणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत शनिवारी मांडला. उद्योग, पायाभूत सुविधांच्या जोरावर महाराष्ट्राचा अर्थगाडा पुढील वर्षी १० टक्क्यांपेक्षाही अधिक गतीने धावेल, असा आशावादही त्यांनी राज्यातील जनतेपुढे ठेवला. अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना ऐनवेळी मवाळ झालेली दिसली. शिवसेनेचेच अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला. या वेळी कर्जमाफीची मागणी लावून धरत टाळ नादावर विरोधकांनी घोषणाबाजीने दोन्ही सभागृहे दणाणून सोडली.

- 62,844कोटींची तरतूद विविध योजनांसाठी करताना अर्थमंत्र्यांनी ४,५११ कोटींची महसुली तूट वाढवून ठेवली आहे.- राज्याच्या महसुली उत्पन्नात भर घालण्यासाठी ३९६ कोटींची करवाढ प्रस्तावित केली आहे. - यंदापासून अर्थसंकल्पीय कामकाजाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला असून योजनेतर आणि योजनांतर्गत खर्चाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. - 710 कोटी रुपये मुंबई प्रकल्पांसाठी - मेट्रो रेल्वे लाइन-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर असून मुंबई मेट्रो -२ अ, दहिस ते डीएन नगर आणि मुंबई मेट्रो रेल्वे लाइन - ७ दहिसर ते अंधेरी यांच्या कामांसह पुणे व नागपूर प्रकल्पासाठी तरतूद 1605 कोटी रुपये

- राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी 2384कोटी रुपये ओबीसी विकास मंत्रालयासाठी 93.8 कोटी रुपये सेवाग्राम विकास आराखड्यासाठी

- प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र राज्यात उभारणार- अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात या विभागाला ७,२३१ कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी २,७00 कोटी जिल्हा योजनांसाठी तर ४,५३१ कोटी राज्यस्तरीय योजनांसाठी देण्यात आले. आरोग्य सेवेसाठी १२७.४५ कोटी, रमाई घरकुल योजनेसाठी ६00 कोटी, वसतिगृहांसाठी ३३0.३0 कोटी, निवासी शाळांसाठी २0१ कोटींचा त्यात समावेश आहे.- 25 कोटी रुपये मुंबई विद्यापीठाला १६0 वर्षे पूर्ण होत आहेत. येथील अर्थशास्त्र विभागाचे ‘मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था’ असे नामकरण करण्यात येणार असून या वर्षीपासून पुढील पाच वर्षे याकरिता २५ कोटी रुपये निधी दिला जाणार-----------------------------------कृषी विकासाला चालना ... यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या भरीव गुंतवणुकीची तरतूद करणारा असून तो राज्याच्या प्रगतीशीलतेबरोबरच शाश्वत कृषी विकासाला चालना देणारा आहे. राज्यातील कृषी क्षेत्र हे मदत व पुनर्वसनाकडून गुंतवणुकीकडे नेण्याच्या आमच्या धोरणाचे यंदाचा अर्थसंकल्प हा प्रतीक आहे. शेती आणि शेतकऱ्यांचा विचार करणारा अर्थसंकल्प मांडल्यामुळे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री