शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

रडत्या नव्हे, लढत्या व्हा!

By admin | Updated: September 6, 2016 04:24 IST

बैलांच्या मदतीने होणारी पारंपारिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे.

तिवसा (अमरावती): बैलांच्या मदतीने होणारी पारंपारिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. सगळीकडे यांत्रिकीकरण होत असताना महिलांनी धन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज आहे. आता महिलांनी रडत्या नव्हे, तर लढत्या बनण्याची गरज आहे असे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालास भाव नाही, अशा परिस्थितीत ताकदीने उभ्या राहणाऱ्या कर्तबगार शेतकरी महिलांच्या भव्य पोळ्याचे आयोजन सोमवारी दुपारी येथील पोलीस ठाण्यालगतच्या पटांगणात शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने करण्यात आले होते. विदर्भात प्रथमच महिला शेतकऱ्यांसाठी असा पोळा आयोजित करण्यात आला. यामध्ये ३१ महिला शेतकऱ्यांनी बैलजोड्यांसह सहभाग नोंदविला. यामध्ये उत्कृष्ट सजावट करणाऱ्या कुमुद विवेक गौरखेडे या महिलेस साडीचोळी आणि २००१ रूपयांचे प्रथम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नेहा निलेश डागा यांनी द्वितीय, तर दामिनी रवि मकेश्वर यांना तृतीय बक्षीस देण्यात आले. महिला शेकतऱ्यांच्या पोळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात आल्याने नागरिकांची कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. तिवस्याच्या नगराध्यक्षा राजकन्या खाकसे, ठाणेदार दिनेश शेळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>पैसेच नाहीत, बैलांना साज कुठून घालावा ?सर्वच महिलांनी बैलजोड्या सुंदर सजवून आणल्या. मात्र, शुभांगी डहाके या शेतकरी महिलेने धन्यासह उपस्थिती लावली खरी. पण, न सजविताच बैलजोडी पोळ्यात आणली होती. ‘पैसेच नसल्याने बैलांचा साज घेऊ शकले नाही’, असे मार्मिक वाक्य लिहिलेला फलक तिने बैलाच्या शिंगांवर लावला होता. शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या या बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रत्येकजण अंतर्मुख झाला.