शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

रडत्या नव्हे, लढत्या व्हा!

By admin | Updated: September 6, 2016 04:24 IST

बैलांच्या मदतीने होणारी पारंपारिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे.

तिवसा (अमरावती): बैलांच्या मदतीने होणारी पारंपारिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. सगळीकडे यांत्रिकीकरण होत असताना महिलांनी धन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज आहे. आता महिलांनी रडत्या नव्हे, तर लढत्या बनण्याची गरज आहे असे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालास भाव नाही, अशा परिस्थितीत ताकदीने उभ्या राहणाऱ्या कर्तबगार शेतकरी महिलांच्या भव्य पोळ्याचे आयोजन सोमवारी दुपारी येथील पोलीस ठाण्यालगतच्या पटांगणात शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने करण्यात आले होते. विदर्भात प्रथमच महिला शेतकऱ्यांसाठी असा पोळा आयोजित करण्यात आला. यामध्ये ३१ महिला शेतकऱ्यांनी बैलजोड्यांसह सहभाग नोंदविला. यामध्ये उत्कृष्ट सजावट करणाऱ्या कुमुद विवेक गौरखेडे या महिलेस साडीचोळी आणि २००१ रूपयांचे प्रथम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नेहा निलेश डागा यांनी द्वितीय, तर दामिनी रवि मकेश्वर यांना तृतीय बक्षीस देण्यात आले. महिला शेकतऱ्यांच्या पोळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात आल्याने नागरिकांची कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. तिवस्याच्या नगराध्यक्षा राजकन्या खाकसे, ठाणेदार दिनेश शेळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>पैसेच नाहीत, बैलांना साज कुठून घालावा ?सर्वच महिलांनी बैलजोड्या सुंदर सजवून आणल्या. मात्र, शुभांगी डहाके या शेतकरी महिलेने धन्यासह उपस्थिती लावली खरी. पण, न सजविताच बैलजोडी पोळ्यात आणली होती. ‘पैसेच नसल्याने बैलांचा साज घेऊ शकले नाही’, असे मार्मिक वाक्य लिहिलेला फलक तिने बैलाच्या शिंगांवर लावला होता. शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या या बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रत्येकजण अंतर्मुख झाला.