शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्रामाणिकतेशी तडजोड करू नका!

By admin | Updated: August 27, 2015 02:01 IST

अधिकाऱ्यांच्या मनात ‘मी सरकारी सेवक आहे’ ही भावना येणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, ही भावना ठेवून काम करा. स्वत:बद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करा.

एन. गोपालस्वामी : यूपीएससीतील यशवंतांचा गौरव

पुणे : अधिकाऱ्यांच्या मनात ‘मी सरकारी सेवक आहे’ ही भावना येणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, ही भावना ठेवून काम करा. स्वत:बद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करा. त्यासाठी प्रामाणिकतेशी तडजोड करू नका, असे आवाहन माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी यशवंतांना केले.एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व ‘लोकमत’च्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१४मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील गुणवंतांचा गौरव बुधवारी करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या परीक्षेत प्रथम आलेली इरा सिंघल, द्वितीय रेणू राज आणि तृतीय निधी गुप्ता यांच्यासह विविध यशवंतांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक, खासदार डॉ. तरुण विजय, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, माईर्स एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अधिष्ठाता प्रा. राहुल कराड, एमआयटी स्कूल आॅफ बिझनेसचे संचालक ग्रुप कॅप्टन (निवृत्त) डी. पी. आपटे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रमुख एस. बी. धर्मपात्रे आदी उपस्थित होते. गोपालस्वामी म्हणाले, लोकप्रतिनिधींना समस्यांची जाणीव असते. त्याचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. (प्रतिनिधी)‘लोकमत’ व एमआयटीचा उपक्रम कौतुकास्पदयूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या परीक्षेतील टॉपरना एकत्रित आणण्याचा ‘लोकमत’ व एमआयटीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशी भावना इरा सिंघल, डॉ. रेणू राज व निधी गुप्ता यांनी या वेळी व्यक्त केली. पंतप्रधान साहाय्यता निधीला ५१ हजार रुपये गौरव सोहळ्यादरम्यान देण्यात आलेली ५१ हजार रुपयांची रक्कम इरा सिंघल यांनी पंतप्रधान साहाय्यता निधीला देण्याचे या वेळी जाहीर केले. लष्कर व प्रशासनात संवाद हवालष्कर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कामाची पद्धत, त्याचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. युद्ध किंवा इतर महत्त्वाच्या घटनांमध्ये लष्कर व प्रशासन यांनी एकत्र येऊन काम केल्यास ते खूप परिणामकारक ठरेल; पण सध्या असे होत नाही, अशी खंत व्ही. पी. मलिक यांनी व्यक्त केली.देशात काही लोकांकडे खूप पैसा आहे, तर दुसरीकडे गरिबी ही मोठी समस्या आहे. हा विरोधाभास दूर व्हायला हवा. त्यासाठी अधिकाऱ्यांनी कुणापुढेही न झुकता प्रामाणिकपणे लोकांच्या अडचणी सोडवायला हव्यात.- डॉ. तरुण विजय, खासदार भारताची संस्कृती ज्ञानाची आहे. ती टिकविण्याची जबाबदारी तरुणांची आहे. भारत हा एकविसाव्या शतकात जगाचे नेतृत्व करेल, असे विवेकानंद यांनी म्हटले आहे. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे.- डॉ. विश्वनाथ कराड