शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

‘दारूसाठी रस्त्यांची मालकी बदलू नका’

By admin | Updated: April 18, 2017 05:48 IST

सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा हा विषय समोर ठेऊन राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दारु दुकाने व बीअरबार बंद करण्याचे आदेश दिलेले असताना

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा हा विषय समोर ठेऊन राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दारु दुकाने व बीअरबार बंद करण्याचे आदेश दिलेले असताना हे महामार्गच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीत करून पळवाट काढून दारू विक्रीला प्रोत्साहन देऊ नका, असे पत्र परिवहन मंत्री आणि राज्य रस्ते सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.या पत्रात रावते यांनी म्हटले आहे की, रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांपासून ५०० मीटरच्या आतील दारूविक्री बंद करण्याचे आदेश दिले. तथापि, राज्यात काही ठिकाणी उदा. धुळे, मुंबई येथे राज्य महामार्ग हे महापालिका किंवा एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्य ठिकाणीही तसे प्रस्ताव आहेत. अशा निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान याचिका प्रकरणास सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा दारुबंदीसंदर्भात नाही तर रस्ते सुरक्षिततेसंदर्भातील आहेत, ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची (महापालिका, नगरपालिका) स्वत:च्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची आर्थिक परिस्थिती नसताना त्यांच्याकडे महामार्ग हस्तांतरीत करण्यामुळे महामार्गांची अवस्था बिकट होऊन अपघात वाढण्याची शक्यता असल्याचे रावते यांनी या पत्रात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)