शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना कर्जमाफीची भीक नको, रोगाचा मूळ उपचार करा!

By admin | Updated: September 24, 2015 01:15 IST

सदाभाऊ खोत यांचे सरकारला आवाहन.

अकोला- शेतकर्‍यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हा उपचार नाही. यापूर्वीच्या कर्जमाफीतून कोणता हेतू साध्य झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीची भीक टाकून मलमपट्टी केल्यापेक्षा रोगाचा मूळ उपचार सरकारने करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी बुधवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केले. वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील दत्ता लांडगे या सुशिक्षित शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या पत्राने सरकारचे आता तरी डोळे उघडावे. नैराश्यात ढकलल्या जात असलेल्या शेतकर्‍यांना यातून बाहेर काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांसोबतच तातडीच्या उपाययोजनांवरही सरकारने भर दिला पाहिजे, असे खोत म्हणाले. शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी सरकार पोहोचले नाही. वरवरची मलमपट्टीच करणे सुरू आहे. जोपर्यंत शेतीवर आधारित अर्थव्यवस्था बळकट होत नाही, तोपर्यंंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाही. कर्ज वितरणाची व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. शेतीपुरक व्यवसाय उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी योजना आखताना विदर्भातील शेती व शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीचा स्वतंत्र विचार होणे आवश्यक असून, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध उद्योजक एकनाथ दुधे यांची उपस्थिती होती.

विजेचा प्रश्न गंभीर

विदर्भातील शेतकर्‍यांसाठी वीज जोडणी न मिळणे हा मोठा प्रश्न आहे. दत्ता लांडगे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी याच कारणामुळे जीवनयात्रा संपविली. पाणी असूनही केवळ वीज जोडणी मिळत नसल्याने शेतकरी निराश होत आहेत. वाशिम आणि अकोला जिल्ह्यात फिरताना ही बाब शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे हा प्रश्न येथे गंभीर स्वरूप धारण करीत असून, तो तातडीने सोडविला गेला पाहिजे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

'शरद पवार पिकनिकवर'

दहा वर्षे राज्य आणि केंद्रात सत्तेत असल्यानंतरही शेतकर्‍यांमध्ये स्वाभिमान जागृत करता न आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आता राज्यात फिरण्याची वेळ आली आहे. दहा वर्षांंत शेतकर्‍यांसाठी आणि विशेषत: विदर्भातील शेतकर्‍यांसाठी काम केले असते, तर शरद पवारांवर आज फिरण्याची वेळ आली नसती. शेतकर्‍यांचा कळवळा आहे म्हणून ते फिरत नाही, तर सत्तेबाहेर फेकल्या गेल्यामुळे वेळ घालविण्यासाठी ते पिकनिकवर निघाले असल्याचा खोचक टोलाही सदाभाऊ खोत यांनी मारला. ७0 हजार कोटी खर्च करून एक टक्काही सिंचन न करता आलेले काका-पुतणे आता पापाचे प्रायश्‍चित्त करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.