शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना कर्जमाफीची भीक नको, रोगाचा मूळ उपचार करा!

By admin | Updated: September 24, 2015 01:15 IST

सदाभाऊ खोत यांचे सरकारला आवाहन.

अकोला- शेतकर्‍यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हा उपचार नाही. यापूर्वीच्या कर्जमाफीतून कोणता हेतू साध्य झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीची भीक टाकून मलमपट्टी केल्यापेक्षा रोगाचा मूळ उपचार सरकारने करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी बुधवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केले. वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील दत्ता लांडगे या सुशिक्षित शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या पत्राने सरकारचे आता तरी डोळे उघडावे. नैराश्यात ढकलल्या जात असलेल्या शेतकर्‍यांना यातून बाहेर काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांसोबतच तातडीच्या उपाययोजनांवरही सरकारने भर दिला पाहिजे, असे खोत म्हणाले. शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी सरकार पोहोचले नाही. वरवरची मलमपट्टीच करणे सुरू आहे. जोपर्यंत शेतीवर आधारित अर्थव्यवस्था बळकट होत नाही, तोपर्यंंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाही. कर्ज वितरणाची व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. शेतीपुरक व्यवसाय उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी योजना आखताना विदर्भातील शेती व शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीचा स्वतंत्र विचार होणे आवश्यक असून, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध उद्योजक एकनाथ दुधे यांची उपस्थिती होती.

विजेचा प्रश्न गंभीर

विदर्भातील शेतकर्‍यांसाठी वीज जोडणी न मिळणे हा मोठा प्रश्न आहे. दत्ता लांडगे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी याच कारणामुळे जीवनयात्रा संपविली. पाणी असूनही केवळ वीज जोडणी मिळत नसल्याने शेतकरी निराश होत आहेत. वाशिम आणि अकोला जिल्ह्यात फिरताना ही बाब शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे हा प्रश्न येथे गंभीर स्वरूप धारण करीत असून, तो तातडीने सोडविला गेला पाहिजे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

'शरद पवार पिकनिकवर'

दहा वर्षे राज्य आणि केंद्रात सत्तेत असल्यानंतरही शेतकर्‍यांमध्ये स्वाभिमान जागृत करता न आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आता राज्यात फिरण्याची वेळ आली आहे. दहा वर्षांंत शेतकर्‍यांसाठी आणि विशेषत: विदर्भातील शेतकर्‍यांसाठी काम केले असते, तर शरद पवारांवर आज फिरण्याची वेळ आली नसती. शेतकर्‍यांचा कळवळा आहे म्हणून ते फिरत नाही, तर सत्तेबाहेर फेकल्या गेल्यामुळे वेळ घालविण्यासाठी ते पिकनिकवर निघाले असल्याचा खोचक टोलाही सदाभाऊ खोत यांनी मारला. ७0 हजार कोटी खर्च करून एक टक्काही सिंचन न करता आलेले काका-पुतणे आता पापाचे प्रायश्‍चित्त करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.